शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 06:41 IST

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभंग व भारुडाला त्याच पद्धतीने दिले प्रत्युत्तर

नागपूर : ‘पाहुनि सौख्य माझे,  देवेंद्र तोही लाजे,  शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन उद्धृत करीत ‘माझे सरकार हे रिक्षावाल्यांचे आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही. ते जनतेला चिंतामुक्त आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या मुनगंटीवार यांच्या कोटीवर, ‘सुधीर होऊ नका अधीर, झाले तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते नवे सरकार’, असा चिमटाही त्यांनी काढला.

शाब्दिक कोट्या, बोचरे शब्द यांचा वापर करीत ठाकरे यांनी विरोधकांचा हल्ला परतवला. ‘आपले सरकार त्रिशंकू नाही. हे गोरगरिबांचे सरकार असून राज्यात ज्या विकास कामांना स्थगितीच्या सूचना आहेत त्यातील त्रुटी दूर करून ती सुरू ठेवण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

पक्षभेदांपलीकडे जाऊन कामे करू, दुजाभाव करणार नाही, अशी ग्वाही देत ठाकरे म्हणाले की, ‘संताचा तो प्रचार अमर... अजूनही लोकमनावर, राज्य चालोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरती’ या राष्ट्रसंतांच्या ओळींप्रमाणे शेवटच्या माणसांसाठी आपल्या सरकारचे काम असेल.

संत गाडगेबाबा यांचा उद्या स्मृतिदिन आहे. त्यांनी साध्यासोप्या भाषेत जीवनाचे सार सांगितले आहे. त्याप्रमाणे भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, वस्र, निवारा देणे, खचलेल्यांना जगण्याची हिंमत देण्याचे काम आपले सरकार करेल. सरकारकडून गाडगेबाबांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा बोर्ड आपण मंत्रालयात मोठा करून लावू, असे ते म्हणाले.

भाजपच्या काही नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचे दाखले देत आता याच पक्षाला शेतकºयांचा पुळका आला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात तुम्ही कामे केलीच नाहीत असे मी म्हणणार नाही, पण सध्या मी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतोय. त्यात, रस्ते होईचना, पाणी मिळेचना, अशी अवस्था असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

आमचे देसाई अन् तिकडे कसाई !आधीच्या सरकारमध्ये उद्योग खाते शिवसेनेकडे होते हे खरे आहे. आमचे देसाई होते, पण तिकडे कसाईदेखील होते. त्यांनी आणलेल्या नोटाबंदी, जीएसटीमुळे महाराष्ट्रात येऊ पाहणारे उद्योग दुसरीकडे गेले, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लगावला.काळा पैसा येईचना अच्छे दिन येईचना‘काट्याच्या अणीवर बसले तीन गावं, दोन ओसाड, एक वसेचिना’ ही संत ज्ञानेश्वरांची ओळ सांगत तीन पक्षांच्या सरकारचे वर्णन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर ठाकरे यांनी प्रत्युत्तरात चिमटे काढले तेव्हा एकच हंशा पिकला. ‘अच्छे दिन येता येईचना, १५ लाख खात्यात जमा होईचना, गरिबी हटेचिना, विदेशातील काळा पैसा येईचना, आर्थिक मंदी जाईचना’ या शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी