शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कामगार युनियन लवकरच

By admin | Updated: July 15, 2017 01:15 IST

नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांवर सातत्याने नोकरी जाण्याची टांगती तलवार असल्याने बेरोजगार होण्याच्या भीतीपायी कर्मचारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांवर सातत्याने नोकरी जाण्याची टांगती तलवार असल्याने बेरोजगार होण्याच्या भीतीपायी कर्मचारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. यापुढील काळात आयटीमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्यासाठी कायदेशीररित्या राज्यात आयटी कामगार युनियन स्थापन केली जाणार आहे. कामगार आयुक्तालयात युनियनसाठी नोंदणी करण्याच्या सर्व निकषांची पूर्तता जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती फोरम फॉर आयटी एम्पलॉईज (एफआयटीई)चे इलव्हरसन राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोनच दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद गौडा या २५ वर्षीय तरुणाने नोकरीच्या अनिश्चिततेमुळे आत्महत्या केल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली. वेगवेगळी कारणे देऊन कर्मचाऱ्यांना नोकरीतून अचानक कमी करणे, राजीनामा देण्यासाठी दबाव आणणे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१४ मध्ये चेन्नईत टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसने तब्बल २५ हजार कर्मचाऱ्यांना कमी केले. खाजगी कंपन्यांवर शासनाचा कोणताच अंकुश नसल्याने कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नसल्याची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनीच पुढे सरसावून एफआयटीई नावाचे एक व्यासपीठ निर्माण केले. चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या असंघटित फोरमला संघटनेच्या छताखाली आणण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. त्यानुसार युनियन नोंदणीच्या सर्व निकषांची पूर्तता पूर्ण झाली आहे. युनियनसाठी जागा पाहिली जाणार असून, सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.>देशभरातून दोन हजारांवर सदस्यया फोरममध्ये विप्रो, टेक महिंद्रा, बीपीओ, टेलिकॉम अशा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे देशभरातील जवळपास दोन हजारांच्या वर तर पुण्यात ३०० सदस्य आहेत. २०१३ साली टाटा कंसलटंंसीमधील ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, त्यातील काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही केस मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.