शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

आयटी कामगार युनियन लवकरच

By admin | Updated: July 15, 2017 01:15 IST

नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांवर सातत्याने नोकरी जाण्याची टांगती तलवार असल्याने बेरोजगार होण्याच्या भीतीपायी कर्मचारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या अनिश्चिततेमुळे कर्मचाऱ्यांवर सातत्याने नोकरी जाण्याची टांगती तलवार असल्याने बेरोजगार होण्याच्या भीतीपायी कर्मचारी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. यापुढील काळात आयटीमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्यासाठी कायदेशीररित्या राज्यात आयटी कामगार युनियन स्थापन केली जाणार आहे. कामगार आयुक्तालयात युनियनसाठी नोंदणी करण्याच्या सर्व निकषांची पूर्तता जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती फोरम फॉर आयटी एम्पलॉईज (एफआयटीई)चे इलव्हरसन राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोनच दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद गौडा या २५ वर्षीय तरुणाने नोकरीच्या अनिश्चिततेमुळे आत्महत्या केल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली. वेगवेगळी कारणे देऊन कर्मचाऱ्यांना नोकरीतून अचानक कमी करणे, राजीनामा देण्यासाठी दबाव आणणे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१४ मध्ये चेन्नईत टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसने तब्बल २५ हजार कर्मचाऱ्यांना कमी केले. खाजगी कंपन्यांवर शासनाचा कोणताच अंकुश नसल्याने कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नसल्याची सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनीच पुढे सरसावून एफआयटीई नावाचे एक व्यासपीठ निर्माण केले. चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या असंघटित फोरमला संघटनेच्या छताखाली आणण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. त्यानुसार युनियन नोंदणीच्या सर्व निकषांची पूर्तता पूर्ण झाली आहे. युनियनसाठी जागा पाहिली जाणार असून, सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.>देशभरातून दोन हजारांवर सदस्यया फोरममध्ये विप्रो, टेक महिंद्रा, बीपीओ, टेलिकॉम अशा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे देशभरातील जवळपास दोन हजारांच्या वर तर पुण्यात ३०० सदस्य आहेत. २०१३ साली टाटा कंसलटंंसीमधील ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, त्यातील काही कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही केस मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.