शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

राजीनाम्याची मागणी केल्याने आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2017 23:47 IST

हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25- हिंजवडीतील आयटी कंपनी प्रशासनाने राजीनाम्याची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून आयटी अभियंता तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नैराश्येपोटी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असले तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 
मीनल अशोकराव देशमुख (वय २८, रा. अनंतानगर, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळची विदर्भ) असे त्या तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. येत्या १८ मे रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती रजेवर होती. मीनल व प्रियांका या दोघी बहिणी येथील सदनिकेत भाड्याने राहत होत्या. सोमवारी प्रियांका तिच्या कामाला निघून गेली; मात्र तब्येत बिघडल्याने ती दुपारी एकच्या सुमारास घरी आली. तिने दाराची बेल वाजवली; परंतु तिला खोलीतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. विवाह जवळ आला असल्याने सुटीवर असलेली मीनल घरीच असे. बेल वाजवल्यानंतर बराच वेळ प्रतीक्षा करूनही प्रतिसाद न आल्याने प्रियंकाने  याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडला. आत खोलीत प्रवेश करताच, दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेली मीनल दिसून आली. तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 
 
 परफॉर्मन्स समाधानकारक नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, असा कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मीनलला तगादा लावला होता. स्वत:हून राजीनामा दे अथवा कंपनी व्यवस्थापनाला कारवाई करणे भाग पडेल, असे तिला धमकावले जात असल्याने तिला नैराश्य आले होते. असे मीनलची बहीण प्रियंका हिचे म्हणणे आहे. प्रियंकाच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्ह दिसून येत आहेत. या घटने नंतर पोलिसांनीही कमालीची गुप्तता बाळगली असल्याने संशय बळावला आहे.
कंपनीतील असुरक्षिततेचे काय?
 
हिंजवडीत रसिला राजू ओपी या आयटी अभियंता तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी कंपनीत खून झाला. तत्पूर्वी तळवडे सॉफटवेअर कंपनीत काम करणाºया अंतरा दास या तरुणीच्या खुनाची घटना घडली होती. आयटी क्षेत्रात काम करणाºया युवतींचे आत्महत्येचे प्रमाण वाढू लागल्याने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षा अभियान उपक्रम राबवून आयटीतील तरुणींशी थेट संवाद साधला होता. त्या वेळी बाहेरील सुरक्षिततेच्या उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत. परंतु, कंपनीत काही त्रास असेल तर युवतींनी सांगावे, असेही शुक्ला यांनी सांगितले होते. मात्र, कोणीही आतापर्यंत अशी तक्रार दिली नव्हती़