शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

सैनिक जखमी होताना भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:32 IST

Kargil Vijay Diwas : कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी सांगितला कारगिलचा अनुभव

ठळक मुद्देकारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होतेकारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होतेकारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते, या काळात कुणीही सुरक्षित नसायचे,

सोलापूर : युद्ध सुरू असताना सौनिकांवर औषधोपचार व त्यांची सेवा केली. त्या काळातील आमचा अनुभव तसा वाईट होता. कारण आमच्या डोळ्यांसमोर आमचे सैनिक जखमी झालेले आम्ही पाहत होतो. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवून काम करणे आमच्यासाठी गरजेचे होते, असा अनुभव मार्तंड दाभाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितला.

कारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होते. जखमी झालेल्या सैनिकांवर आम्ही प्रथमोपचार करत होतो. सैनिकांची प्रकृती खराब असेल तर त्याला हेलिकॉप्टरने श्रीनगर किंवा दिल्ली येथील रुग्णालयात पाठवत होतो. कधी कोणत्या परिस्थितीत आपला सौनिक येईल, हे सांगता येत नसायचे. जो समोर येईल त्याच्यावर प्रथमोपचार करणे हेच हाती असायचे. पुढील उपचारासाठी उधमपूर किंवा दिल्ली येथे सैनिकास पाठविल्यानंतर त्याचे काय झाले, हे आम्हाला कळायचे नाही. कुणाचा हात तर कुणाचा पाय धडापासून वेगळा झालेला असायचा. अशा रुग्णांवर विशेष प्रथमोपचार करावा लागायचा. रक्त वाहण्याचे थांबविणारे बँडेज व वेदना कमी करण्याचे इंजेक्शन यांचा जास्त वापर होत होता, असे मार्तंड दाभाडे यांनी सांगितले. 

ते आता सोलापुरातील सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक म्हणून काम करत आहेत. सैन्यात ३० वर्षे सेवा केल्याबद्दल त्यांना मानद कॅप्टन ही पदवी देण्यात आली आहे. ते मूळचे नाशिक येथील आहेत.

कारगिलमध्ये बॉम्बिंग नेहमीच व्हायचे..कारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होते. कारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते. या काळात कुणीही सुरक्षित नसायचे, असा अनुभव कारगिल येथे सैन्याला रसद पुरविण्यासाठीचे कार्यालयीन काम करणाºया गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितला. कारगिलपासून मुंजीगाव येथे आम्हाला जावे लागायचे. तेथून सात किलोमीटर अंतरावर पाकिस्तान दिसत होता. हा परिसर मोकळा असल्याने एखादा माणूसही सहज दिसत होता. त्यामुळे लगेच गोळीबार केला जात होता. पुढे लढणाºया सैनिकांना सक्षम ठेवणे, त्यांना रसद पुरविणे, रेशन (राशन) पुरवणे आदी आमचे काम होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. गुरुनाथ कुलकर्णी हे सध्या सौनिक कल्याण कार्यालय येथे लिपिक म्हणून काम करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तान