शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक जखमी होताना भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:32 IST

Kargil Vijay Diwas : कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी सांगितला कारगिलचा अनुभव

ठळक मुद्देकारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होतेकारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होतेकारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते, या काळात कुणीही सुरक्षित नसायचे,

सोलापूर : युद्ध सुरू असताना सौनिकांवर औषधोपचार व त्यांची सेवा केली. त्या काळातील आमचा अनुभव तसा वाईट होता. कारण आमच्या डोळ्यांसमोर आमचे सैनिक जखमी झालेले आम्ही पाहत होतो. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवून काम करणे आमच्यासाठी गरजेचे होते, असा अनुभव मार्तंड दाभाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितला.

कारगिल येथील युद्ध ३१ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान सुरू होते. जखमी झालेल्या सैनिकांवर आम्ही प्रथमोपचार करत होतो. सैनिकांची प्रकृती खराब असेल तर त्याला हेलिकॉप्टरने श्रीनगर किंवा दिल्ली येथील रुग्णालयात पाठवत होतो. कधी कोणत्या परिस्थितीत आपला सौनिक येईल, हे सांगता येत नसायचे. जो समोर येईल त्याच्यावर प्रथमोपचार करणे हेच हाती असायचे. पुढील उपचारासाठी उधमपूर किंवा दिल्ली येथे सैनिकास पाठविल्यानंतर त्याचे काय झाले, हे आम्हाला कळायचे नाही. कुणाचा हात तर कुणाचा पाय धडापासून वेगळा झालेला असायचा. अशा रुग्णांवर विशेष प्रथमोपचार करावा लागायचा. रक्त वाहण्याचे थांबविणारे बँडेज व वेदना कमी करण्याचे इंजेक्शन यांचा जास्त वापर होत होता, असे मार्तंड दाभाडे यांनी सांगितले. 

ते आता सोलापुरातील सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक म्हणून काम करत आहेत. सैन्यात ३० वर्षे सेवा केल्याबद्दल त्यांना मानद कॅप्टन ही पदवी देण्यात आली आहे. ते मूळचे नाशिक येथील आहेत.

कारगिलमध्ये बॉम्बिंग नेहमीच व्हायचे..कारगिलमध्ये युद्ध सुरू असताना नेहमीच बॉम्बिंग होत होते. कारगिलमध्ये तणावाचे वातावरण होते. या काळात कुणीही सुरक्षित नसायचे, असा अनुभव कारगिल येथे सैन्याला रसद पुरविण्यासाठीचे कार्यालयीन काम करणाºया गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितला. कारगिलपासून मुंजीगाव येथे आम्हाला जावे लागायचे. तेथून सात किलोमीटर अंतरावर पाकिस्तान दिसत होता. हा परिसर मोकळा असल्याने एखादा माणूसही सहज दिसत होता. त्यामुळे लगेच गोळीबार केला जात होता. पुढे लढणाºया सैनिकांना सक्षम ठेवणे, त्यांना रसद पुरविणे, रेशन (राशन) पुरवणे आदी आमचे काम होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. गुरुनाथ कुलकर्णी हे सध्या सौनिक कल्याण कार्यालय येथे लिपिक म्हणून काम करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तान