शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मोदी नावाचं गारूड फेकून देण्याची जबाबदारी आपलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:33 IST

लोकांच्या मनावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गारूड कमी होत चालले आहे. ते मोदींनी नाही तर आपणच निर्माण केलेय, त्यामुळे ते फेकून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.

ठाणे : लोकांच्या मनावर असलेले नरेंद्र मोदी नावाचे गारूड कमी होत चालले आहे. ते मोदींनी नाही तर आपणच निर्माण केलेय, त्यामुळे ते फेकून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एकविसावा दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. लेखिका शिल्पा कांबळे आणि चित्रकार सुधीर पटवर्धन यांना यंदाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध नाट्यलेखक, पटकथाकार संजय पवार, सुप्रसिद्ध कला समीक्षक सुधाकर यादव, डॉ. प्रज्ञा पवार उपस्थित होते.या समारंभात केतकर म्हणाले, मोदींच्या नावाचे गारूड कमी होत असेल, तर त्याचा परिणाम गुजरात, कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये दिसेल. आपण भाग्यवान असू तर २०१९ च्या निवडणुकांमध्येही दिसेल. त्याची सुरुवात झाली आहे. यशवंत सिन्हांनी मोदींबद्दल लिहिलेले उघड पत्र ही त्याचीच चिन्हे आहेत.आज सगळ्यात जास्त निषेध हा व्यंगचित्रातून व्यक्त होतो आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल असलेले राज ठाकरे यांनी फेसबुकवर जाहीर केले की, व्यंगचित्रातून मी माझी भूमिका मांडणार. त्याची सुरुवात मोदींच्या विरोधात कठोर चित्र काढून केली. सुदैवाने त्यांना उपरती लवकर झाली असून ते जाहीरपणे क्षमा मागतात की, चुकलं माझं. तुमचं चुकलं पण आमची वाट लागली, अशा शब्दांत केतकर यांनी राज यांचीही खिल्ली उडवली. साहित्याबद्दल बोलताना लोकांची वेदना समजली, तर नव्या काळाचं प्रोटेस्ट लिटरेचर जन्माला येईल. सध्या सामाजिक परिस्थिती नाही तर आपण थिजलोय. वास्तव फेकून सत्य निर्माण करण्याची ताकद चित्र, कथा, कला, कादंबरीमध्ये आहे, असेही ते म्हणाले.सुधाकर यादव यांनी भारतीय चित्रकलेची परंपरा सांगत पटवर्धन यांच्या चित्रांची वेगळीकता अधोरेखित केली. पुरस्काराने आपल्यावरील दबाव वाढला असून अजून खूप काम करायचे आहे, अशा शब्दांत शिल्पा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कलाकारांनीच माझा केलेला सत्कार मला खूप महत्त्वाचा वाटतो, असे पटवर्धन म्हणाले.कुठे गेले अण्णा, आंदोलन आणि लोकपाल?अण्णा हजारे यांच्यासाठी ठाण्यात तेव्हा निघालेल्या मोर्चाने ट्रॅफिक जॅम झाले होते. सगळे जण ‘मी अण्णा’ अशा टोप्या घालून फिरत होते; पण अण्णा किती फ्रॉड आहेत, हे आम्ही सांगत होतो. कोणी ऐकत नव्हते. आता कुठे गेले अण्णा, त्यांचे आंदोलन आणि ६ वर्षे झाली, कुठे आहे लोकपाल? देशातील भ्रष्टाचार संपला आहे की, मोदींना सत्तेवर आणण्याची ती पूर्वतयारी होती, असा थेट सवाल केतकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार