शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

घरे देणे पालिकेचे कर्तव्य नाही

By admin | Updated: January 7, 2017 06:11 IST

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे कर्तव्य नाही

मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे कर्तव्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महापालिकेतून निवृत्त होऊनही भाडेतत्त्वावरील घराचा ताबा न सोडणाऱ्या सुमारे ४००० कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास नकार दिला. या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला न दिल्यास महापालिका संबंधितांवर फौजदारी कारवाई करू शकते, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेली घरे कायमस्वरूपी नावावर करण्यात यावी, यासाठी विक्रोळी पार्कसाइट, बर्वेनगर (घाटकोपर), मिठानगर (गोरेगाव), मालवणी (मालाड) येथे महापालिकेच्या बैठ्या चाळीत राहणाऱ्या ९०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.१९८९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि सुधार समितीने महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत, असा प्रस्ताव माहापालिका आयुक्तांपुढे ठेवला होता. तशी योजनाही तयार करण्यात आली. मात्र ही योजना कागदावरच राहिली. उलट २०१० मध्ये तत्कालीन आयुक्तांनी भाडेतत्त्वावर राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे खाली करण्याचा आदेश दिला. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे मिळू शकत नाहीत, हेही स्पष्ट केले. मात्र महापालिकेच्या १९८९ च्या योजनेचा हवाला देत निवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या २०१० च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.परंतु, महापालिकेने ही योजना प्रत्यक्षात उतरवणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले. भाडेतत्त्वावर दिलेली घरे लाटण्याच्या वृत्तीमध्ये वाढ झाली आहे, या वृत्तीला आळा बसवणे आवश्यक आहे. मुंबईत घरांसाठी जागा मिळणे अशक्य आहे. तसेच ते आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही, अशी भूमिका महापालिकेने उच्च न्यायालयात घेतली.‘या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घरे अडवल्याने सध्या महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. रुग्णालय, फायर ब्रिगेड, पाणी इत्यादी महत्त्वाच्या विभागांत काम करणारे कर्मचारी घरे मिळवण्याच्या यादीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामावर परिणाम होत आहे. तसेच याचिकाकर्त्यांना घरे दिली तर महापालिकेत सध्या काम करणाऱ्या एक लाख ३० हजार कर्मचाऱ्यांचीही भविष्यात सोय करावी लागेल,’ असा युक्तिवाद महापालिकेच्या वतीने करण्यात आला. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या भूमिकेशी सहमती दर्शवत घरे कायमची कर्मचाऱ्यांच्या नावे करण्याचे अशक्य असल्याचे म्हटले. ‘सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे कोणाच्याही नावे करणे शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सार्वजनिक मालमत्तेचा विकास करायचा असल्यास किंवा विक्री करायची असल्यास त्यासाठी निविदा काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता अशा प्रकारे कोणाच्याही नावे करण्याचा आदेश आम्ही आयुक्तांना देऊ शकत नाही. त्यामुळे निवृत्त होऊनही घरांचा ताबा न देणाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांत घरांचा ताबा महापालिकेला द्यावा. वेळेत ताबा न दिल्यास महापालिका फौजदारी कारवाई करू शकते. तसेच संबंधितांकडून नुकसानभरपाई घेऊ शकते. प्रसंगी त्यांची वैयक्तिक मालमत्ताही जप्त करू शकते. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य नाही,’ असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या. (प्रतिनिधी)>भाडे वसूल होणारज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घराचा ताबा देण्यास नकार दिला त्यांचे अंशदानही महापालिकेने थकीत ठेवले आहे. त्यांच्याकडून घराचे भाडे थकीत असल्याने अंशदानातूनच भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांकडून बाजारभावानेच भाडे वसूल करण्यात येणार आहे.महापालिकेच्या या निर्णयालाही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने तेही फेटाळले. ‘कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे घरांचा ताबा घेणाऱ्यांना आम्ही दिलासा देऊ शकत नाही. याचिकाकर्त्यांनी वेळेत घरे मोकळी केल्यास महापालिका उर्वरित रक्कम त्यांना परत करेल,’ असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाचा परिणाम पालिकेच्या ४०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर होणार आहे.