शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आहे महारेरा तरी... महामुंबईत बिल्डरच ठरतात भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2023 09:06 IST

या सर्व घडामोडी २०११-१२ च्या काळातील आहेत. 

रविकिरण देशमुख, वृत्तसंपादक

महारेराची जन्मकथा अत्यंत मजेशीर आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये या कायद्याचे बीज रोवले गेले. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी होते आणि ते या कायद्यासाठी प्रयत्नशील होते. महाराष्ट्रात फक्त गृहनिर्माण या विषयापुरता कायदा करण्याची चर्चा होती. केंद्र सरकार मात्र घरांसह व्यावसायिक बांधकामे आणि सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए यासारख्या संस्था जी कामे करतात त्यांनाही सामावून घेणारा कायदा करण्याच्या विचारात होते. या सर्व घडामोडी २०११-१२ च्या काळातील आहेत. 

महाराष्ट्रात हा कायदा करताना  घटक पक्षाच्या बड्या नेत्यांना हे आवडले नाही, अशी चर्चा होती. या चर्चेला हळूहळू पाय फुटत गेले. मंत्रालयातल्या एका बड्या अधिकाऱ्याला दिल्लीला बोलावण्यात आले आणि हा कायदा करण्याच्या फंदात तुम्ही कशाला पडताय, असा सवाल केला गेला, अशी चर्चा होती.

महाराष्ट्राचा कायदा लागू होतोय न होतोय तोवर २०१४ च्या लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका होऊन गेल्या. दोन्हीकडे सरकारमध्येही बदल झाला. अखेर केंद्रानेच कायदा केला आणि महाराष्ट्राने आपला स्वतःचा २०१२ चा कायदा रद्द करून केंद्राची रचना स्वीकारली. त्या दरम्यान या कायद्याच्या कक्षेतून पायाभूत सुविधांची बांधकामे, औद्योगिक परिसरातील बांधकामे यातून बाहेर गेली. केंद्राच्या कायद्यानंतर २०१७ मध्ये महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात दाद मागण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यापूर्वी सत्र न्यायालयात जावे लागे आणि तिथे अशी प्रकरणे वर्षानुवर्षे रेंगाळत असत. 

बिल्डरांनाही महारेरामुळे चांगलाच चाप बसला असून तिथे नोंदणी केल्याशिवाय त्यांना प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही अथवा वाट्टेल तशी आश्वासने देता येत नाहीत. आयुष्यभराची जमा केलेली पुंजी अथवा कर्ज उभारून घर घेणाऱ्यांना महारेराचा आधार आहे.केवळ बिल्डरांवर नाही तर प्रापर्टी एजंटांनाही महारेराच्या कक्षेत आणले आहे. पण, त्यांची केवळ परीक्षा घेतल्याने आणि प्रशिक्षण दिल्याने हा प्रश्न सुटणारा नाही. कारण एजंटांनी एखाद्या व्यवहारात किती रक्कम फी म्हणून घ्यावी यावर नियंत्रण नाही. राज्यातील सुमारे ७,६७८ उमेदवार इस्टेट एजंट होण्यास पात्र ठरले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर व ऑक्टोबर ते मार्च असा त्यांच्या व्यवहारांचा तपशील स्वतःच्या संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर नोंदणी नसलेल्या वा फसव्या जाहिरातींमुळे नुकसान होऊ नये म्हणून आजवर ३२७ प्रकरणांमध्ये महारेराने स्वतःहून दखल घेतली आहे. गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींसोबत १ ऑगस्टपासून महारेरा क्रमांक व संकेतस्थळाच्या बाजूला ठळकपणे क्यूआर कोड छापणे बंधनकारक आहे, अन्यथा ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाईल. 

तरीही आज बिल्डर कोण बनू शकतो याची व्याख्या निश्चित नाही. सन २००० च्या दशकात नगरविकास विभागाने या विषयावर काम सुरू केल्याचे म्हटले गेले. काही निकष तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या न झाल्या तोच त्याला खीळ बसली. आज बांधकाम क्षेत्रात कोणीही प्रवेश करू शकतो. त्याला काही निकष नाहीत.

 

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017