शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य

By admin | Updated: September 2, 2015 02:15 IST

वीज चोरी असलेल्या भागात विद्युत वाहिन्या बदलण्यास सुरुवात.

अकोला: विद्युत तारांवर आकोडे (हूक) टाकून वीज चोरी करणे आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेल्या विद्युत वाहिन्यांचा (एअर बॅन्च केबल -एबीसी) वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे आता वीज चोरी करणे अशक्य होणार आहे. विद्युत निर्मिती क्षेत्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचविताना विद्युत तारांमधून जवळपास १४ टक्के वीज गळती होते. तसेच अनेक गावांमध्ये, शहरातील गरीब भागात तारांवर आकोडे किंवा हूक टाकून वीज चोरी केली जाते. हे रोखण्याकरिता महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली विद्युत तार बनविली आहे. महावितरणने वीज बिलाच्या वसुलीनुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ असे फिडर तयार केले आहे. यामध्ये ई, एफ व जी-१, जी-२ या फिडरमधून ज्या भागात विद्युत पुरवठा होतो, तेथेच भारनियमन केले जाते. महावितरणच्या वतीने सध्या राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प- १ सुरू आहे. याअंतर्गत पुनर्रचित गतिमान विद्युत सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या फिडरवर जास्त वीज चोरी आहे, अशा फिडरवरील लघू वाहिन्या बदलून त्या ठिकाणी प्लास्टिकचे आवरण असलेली तार लावण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही जिल्हय़ांची निवड करण्यात आली असून, नंतर संपूर्ण राज्यात याच तारेचा वापर केला जाणार आहे.

जीवित हानीही कमी होणार

एखाद्या कॉलनीमधील किंवा ग्राहकाच्या घरातील विद्युत प्रवाह बंद झाला तर अनेकदा लाइनमन किंवा अन्य व्यक्ती खांबावर चढून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एबीसीमुळे या अपघातांवर नियंत्रण मिळविता येणार आहे. तारांवर पक्षी, वटवाघळं, माकड नेहमीच बसतात. त्यांचाही अनेकदा दोन तारांना स्पर्श झाला तर मृत्यू होतो. या तारांमुळे पक्षी व प्राण्यांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी होणार आहे.

चारऐवजी एकच तार

महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली तार (एअर बॅन्च केबल -एबीसी) चा वापर करणे सुरू केले आहे. सध्या रोहित्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत खांबाद्वारे चार तारांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. आता मात्र चार तारांऐवजी केवळ एकाच तारेचा समावेश राहणार आहे.