शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य

By admin | Updated: September 2, 2015 02:15 IST

वीज चोरी असलेल्या भागात विद्युत वाहिन्या बदलण्यास सुरुवात.

अकोला: विद्युत तारांवर आकोडे (हूक) टाकून वीज चोरी करणे आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेल्या विद्युत वाहिन्यांचा (एअर बॅन्च केबल -एबीसी) वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे आता वीज चोरी करणे अशक्य होणार आहे. विद्युत निर्मिती क्षेत्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचविताना विद्युत तारांमधून जवळपास १४ टक्के वीज गळती होते. तसेच अनेक गावांमध्ये, शहरातील गरीब भागात तारांवर आकोडे किंवा हूक टाकून वीज चोरी केली जाते. हे रोखण्याकरिता महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली विद्युत तार बनविली आहे. महावितरणने वीज बिलाच्या वसुलीनुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-१, जी-२ असे फिडर तयार केले आहे. यामध्ये ई, एफ व जी-१, जी-२ या फिडरमधून ज्या भागात विद्युत पुरवठा होतो, तेथेच भारनियमन केले जाते. महावितरणच्या वतीने सध्या राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प- १ सुरू आहे. याअंतर्गत पुनर्रचित गतिमान विद्युत सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या फिडरवर जास्त वीज चोरी आहे, अशा फिडरवरील लघू वाहिन्या बदलून त्या ठिकाणी प्लास्टिकचे आवरण असलेली तार लावण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही जिल्हय़ांची निवड करण्यात आली असून, नंतर संपूर्ण राज्यात याच तारेचा वापर केला जाणार आहे.

जीवित हानीही कमी होणार

एखाद्या कॉलनीमधील किंवा ग्राहकाच्या घरातील विद्युत प्रवाह बंद झाला तर अनेकदा लाइनमन किंवा अन्य व्यक्ती खांबावर चढून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एबीसीमुळे या अपघातांवर नियंत्रण मिळविता येणार आहे. तारांवर पक्षी, वटवाघळं, माकड नेहमीच बसतात. त्यांचाही अनेकदा दोन तारांना स्पर्श झाला तर मृत्यू होतो. या तारांमुळे पक्षी व प्राण्यांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी होणार आहे.

चारऐवजी एकच तार

महावितरणने प्लास्टिकचे आवरण असलेली तार (एअर बॅन्च केबल -एबीसी) चा वापर करणे सुरू केले आहे. सध्या रोहित्रापासून तर ग्राहकांच्या घरापर्यंत खांबाद्वारे चार तारांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. आता मात्र चार तारांऐवजी केवळ एकाच तारेचा समावेश राहणार आहे.