शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक

By admin | Updated: March 7, 2017 01:08 IST

स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे.

पिंपरी : स्त्रियांचे अनुभव, त्यांचे सुख-दु:ख साहित्यात येणे आवश्यक आहे. जेणेकरून ते साहित्य महिलांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे स्त्रियांनी लिहिते होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया वाड यांनी केले. स्वानंद महिला संस्था आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला विभाग यांच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिरात बारावे अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन सोमवारी झाले. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. रुचिरा सुराणा यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष मंगल संचेती, मुंबई दूरदर्शन केंद्राचे महासंचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, संमेलनाच्या मुख्य संयोजिका सुरेखा कटारिया, स्वानंद संस्थेच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षा वर्षा टाटिया, पारस मोदी, डॉ. नलिनी जोशी, कांतीलाल बोथरा, मोहनलाल संचेती, प्रमिला सांकला, रंजना लोढा, आदेश खिंवसरा आदी उपस्थित होते.डॉ. वाड म्हणाल्या, ‘‘स्त्री साहित्याकडे हेटाळणीने पाहण्याचे दिवस गेले आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या मनाचे विरेचन साहित्यातून केले आहे. तसेच आपल्या साहित्याची समीक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावी. कारण जो समीक्षेकडे सकारात्मकतेने पाहतो, तोच खरा साहित्यिक होय. पालकांनी मुलींना स्वातंत्र्य द्यावे, जेणेकरुन त्या मुक्त वावरतील आणि त्यातून आपल्याला उत्तम साहित्य मिळेल.’’ जैन कॉन्फरन्स पंचम झोन प्रदेशाध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी प्रास्ताविक केले.मराठी साहित्याचे वाचन जैन महिला खूप करतात. मात्र त्या लिखाण करत नाहीत. त्यांची विचारक्षमता जास्त असते. मात्र त्या बोलत नाहीत. या महिलांनी लिहिले पाहिजे. आपले विचार व्यक्त केले पाहिजेत, असे आवाहन रुचिरा सुराणा यांनी केले. मंगल संचेती यांनी स्वागत केले. या वेळी जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस दिवंगत शंकरलाल मुथा यांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सकाळी आठला संत तुकारामनगर येथील संत तुकाराममहाराज मंदिरापासून आचार्य अत्रे रंगमंदिरापर्यंत ग्रंथदिंडीही काढण्यात आली.>परिसंवाद : करिअर जन्मठेप नव्हे, स्वावलंबनघर सांभाळून नोकरी करणे हे महिलांचे कौशल्यच आहे. आजची स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहे. करिअर हे महिलांसाठी जन्मठेप नसून, स्वावलंबन आहे, असा सूर संमेलनातील सहाव्या सत्रात झालेल्या परिसंवादात उमटला. अध्यक्षस्थानी आॅल इंडिया जैन कॉन्फरन्सचे महामंत्री अशोककुमार पगारिया होते. या परिसंवादात प्रतिभा जगताप, हणमंत पाटील, दीपक मुनोत, सुरेखा कटारिया यांनी भाग घेतला. डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचलन केले. > महिला एकत्र येण्यासह त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी आणि महिलांविषयक साहित्याची दिशा निश्चित करण्यासाठी संमेलनाचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे आणि स्त्री चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी स्त्रियांचे साहित्य हे प्रमुख माध्यम आहे. - मंगला अभय संचेती, स्वागताध्यक्षा, अ.भा. स्त्री साहित्य-कला संमेलन