शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

मराठवाड्यात पाणी, रोजगाराचा प्रश्न पेटला

By admin | Updated: March 29, 2016 01:47 IST

दुष्काळामुळे मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी व रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असून सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निलंगा

लातूर/ उस्मानाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी व रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असून सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निलंगा तालुक्याच्या अंबुलगा (बु.) येथील नागरिकांनी सोमवारी सरपंच व ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात नुकसानाच्या भरपाईसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला़ मनरेगाची कामे लोकांना मिळत नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षाने पंचायत समितीत आत्मदहनाचा प्रयत्न केला.निलंगा तालुक्याच्या अंबुलगा (बु.) येथे चार कुपनलिकांचे मालक नागरिकांना पाणी देत नाहीत. त्यामुळे त्यांचे अधिग्रहण रद्द करून, नवीन अधिग्रहण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली. परंतु, त्याकडे सरपंच दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर धाव घेतली. टंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू करावे, अशी मागणी करीत सरपंच मीना सूर्यवंशी व ग्रामसेवक आर.डी. वाघमारे यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अर्धा तास कोंडले. पोलिसांनी गावात धाव घेत अर्र्ध्या तासानंतर या दोघांना बाहेर काढले. येत्या दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करू, असे लेखी आश्वासन सरपंच व ग्रामसेवकाकडून मिळल्यानंतरच ग्रामस्थांनी माघार घेतली. (प्रतिनिधी)गैरसमजुतीतून झालेला प्रकारसुरेखा माने यांना शासनाकडून एक लाखाची मदत देण्यात आली आहे़ शिवाय खरीप अनुदानापोटी राजेंद्र माने यांच्या नावे प्राप्त असलेले अनुदान १२ हजार ४४४ रूपये त्यांचे अकाऊंट इन आॅपरेटीव असल्यामुळे एनईएफटी रिवर्स झालेली आहे़ त्यामुळे अनुदानात कपात करून कर्ज खात्यावर वर्ग करण्यात आले; या म्हणण्यात तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे़मनविसे जिल्हाध्यक्षांचा पेटवून घेण्याचा प्रयत्नलातूर : मनरेगा कामे मजुरांऐवजी यंत्राद्वारे केली जात आहेत. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनविसेचे जिल्हाध्यक्ष निलेश भंडे यांनी सोमवारी पंचायत समितीच्या बैठकीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. विहिरीत पडून गंभीर जखमीअहमदपूर तालुक्यातील देवकरा गावानजीक पाणी काढताना वाहिरीत पडून ज्ञानोबा पंडित मुरकुटे (४५) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांना लातुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी पत्नीने रॉकेल ओतून घेतलेउस्मानाबाद : नुकसानीपोटी प्राप्त झालेले अनुदान कर्जखात्यात वर्ग केल्याचा आरोप करीत मंगरूळ (ताक़ळंब जि़उस्मानाबाद) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला़ मंगरूळ येथील राजेंद्र महादेव माने या शेतकऱ्याने २४ आॅक्टोबर २०१५ रोजी नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या केली आहे़ त्यांनतर त्यांची पत्नी सुरेखा यांना शासनाकडून एक लाखाची मदत मिळाली़ हे अनुदान पतीच्या नावे बँकेत जमा झाले होते़ मात्र, ही रक्कम बँकेने पतीच्या कर्जखात्यात कपात करून घेतलीे़ त्यामुळे सुरेखा माने यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पोर्चमध्ये अंगावर रॉकेल ओतून घेतले़ घटनेनंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन आनंदनगर ठाण्यात नेले़