शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

By admin | Updated: July 13, 2014 21:32 IST

वर्ष २0१२ मध्ये झाला होता ६ बस स्थानकांच्या पुर्नबांधणीचा निर्णय

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी आर्थिक वर्ष २0११-१२ मध्ये 'बांधा वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी नाशिक बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला. त्यानंतर उर्वरित पाचही बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित असताना, विकासाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सर्वच जिल्हा स्तरांवर असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय रापमचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानुसार प्रारंभी नाशिकच्या बसस्थानकाचे रूपडे बदलण्यात आले. यानंतर औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी आणि पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित होते. यासाठी आलेल्या कंत्राटदारांच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी न मिळाल्याने या पाचही प्रमुख बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. रापमचे सदस्य टी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च १९८0 रोजी अकोल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष दे. मा. कराळे यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन पार पडले. बसस्थानकाच्या निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. बसस्थानकाच्या अनेक भागांची रचना ही पुन्हा नव्याने होणे सध्या गरजेचे आहे. मात्र, २0१२ मध्ये आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या ठिकाणी कुठलेच नवीन बांधकाम करता येत नसल्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकरिता बसस्थानकाची इमारत धोकादायक सिद्ध ठरू लागली आहे. गतवर्षी पाऊस अधिक झाल्याने बसस्थानकाच्या सिलिंगचे अनेक ठिकाणी पोपडे पडले होते. १९८0 च्या मानाने आजच्या घडीला वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. बसस्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या यात मोठय़ा प्रमाण वाढ झाली आहे. शहर वाहतुकीलादेखील अडथळय़ाच्या ठरणार्‍या अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. वर्ष २0१२ मध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या निर्णयाची पुनर्समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.