शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

By admin | Updated: July 13, 2014 21:32 IST

वर्ष २0१२ मध्ये झाला होता ६ बस स्थानकांच्या पुर्नबांधणीचा निर्णय

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी आर्थिक वर्ष २0११-१२ मध्ये 'बांधा वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी नाशिक बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला. त्यानंतर उर्वरित पाचही बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित असताना, विकासाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सर्वच जिल्हा स्तरांवर असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय रापमचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानुसार प्रारंभी नाशिकच्या बसस्थानकाचे रूपडे बदलण्यात आले. यानंतर औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी आणि पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित होते. यासाठी आलेल्या कंत्राटदारांच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी न मिळाल्याने या पाचही प्रमुख बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. रापमचे सदस्य टी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च १९८0 रोजी अकोल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष दे. मा. कराळे यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन पार पडले. बसस्थानकाच्या निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. बसस्थानकाच्या अनेक भागांची रचना ही पुन्हा नव्याने होणे सध्या गरजेचे आहे. मात्र, २0१२ मध्ये आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या ठिकाणी कुठलेच नवीन बांधकाम करता येत नसल्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकरिता बसस्थानकाची इमारत धोकादायक सिद्ध ठरू लागली आहे. गतवर्षी पाऊस अधिक झाल्याने बसस्थानकाच्या सिलिंगचे अनेक ठिकाणी पोपडे पडले होते. १९८0 च्या मानाने आजच्या घडीला वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. बसस्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या यात मोठय़ा प्रमाण वाढ झाली आहे. शहर वाहतुकीलादेखील अडथळय़ाच्या ठरणार्‍या अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. वर्ष २0१२ मध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या निर्णयाची पुनर्समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.