शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

हवेतच विरला बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा

By admin | Updated: July 13, 2014 21:32 IST

वर्ष २0१२ मध्ये झाला होता ६ बस स्थानकांच्या पुर्नबांधणीचा निर्णय

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी आर्थिक वर्ष २0११-१२ मध्ये 'बांधा वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल बसस्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी नाशिक बसस्थानकाचा कायापालट करण्यात आला. त्यानंतर उर्वरित पाचही बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित असताना, विकासाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सर्वच जिल्हा स्तरांवर असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा मानस आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकसह औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी व पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय रापमचे केंद्रीय अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानुसार प्रारंभी नाशिकच्या बसस्थानकाचे रूपडे बदलण्यात आले. यानंतर औरंगाबाद, अकोला, कर्‍हाड, रत्नागिरी आणि पनवेल येथील मध्यवर्ती बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित होते. यासाठी आलेल्या कंत्राटदारांच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी न मिळाल्याने या पाचही प्रमुख बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा हवेतच विरला असल्याचे स्पष्ट होत आहे. रापमचे सदस्य टी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च १९८0 रोजी अकोल्याचे तत्कालीन नगराध्यक्ष दे. मा. कराळे यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन पार पडले. बसस्थानकाच्या निर्मितीला ३५ वर्ष पूर्ण झाले आहेत. बसस्थानकाच्या अनेक भागांची रचना ही पुन्हा नव्याने होणे सध्या गरजेचे आहे. मात्र, २0१२ मध्ये आधुनिकीकरणासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या ठिकाणी कुठलेच नवीन बांधकाम करता येत नसल्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांकरिता बसस्थानकाची इमारत धोकादायक सिद्ध ठरू लागली आहे. गतवर्षी पाऊस अधिक झाल्याने बसस्थानकाच्या सिलिंगचे अनेक ठिकाणी पोपडे पडले होते. १९८0 च्या मानाने आजच्या घडीला वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. बसस्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या आणि बसेसची संख्या यात मोठय़ा प्रमाण वाढ झाली आहे. शहर वाहतुकीलादेखील अडथळय़ाच्या ठरणार्‍या अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे. वर्ष २0१२ मध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या निर्णयाची पुनर्समीक्षा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे स्थानिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.