शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

By admin | Updated: March 14, 2016 01:25 IST

शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक; बुधवारी करणार आंदोलन.

अकोला: तीन वर्षांपासून सातत्याने नापिकीचा सामना करीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या मुद्यावर आता राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारला घरचा आहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोला जिल्हा शिवसेनेने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठक रविवार दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत शासनाकडून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गत आठवड्यात शिवसेना पदाधिकार्‍यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती, असे सांगून जिल्हा प्रमुखांनी या मुद्यावर कोणताही समाधानकारक निर्णय अद्याप शासनाकडून घेण्यात आला नसल्याने शिवसेनेला शेतकर्‍यांच्या मुद्यावर आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा दिला. शिवसेनेतर्फे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत धरणे दिले जाणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी अडचणीत असतील तेव्हा त्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून जाईल. त्यासाठी आम्ही सत्तेत आहो किंवा नाही याचा विचार करणार नाही. आंदोलन करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसैनिकांचा जन्म झाला असल्याचे पिंजरकर म्हणाले. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार रामाभाऊ कराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपजिल्हा प्रमुख सेवकार ताथोड, बंडू ढोरे, उपमहापौर विनोद मापारी यांनी आढावा बैठकीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा यांनी तर संचालन योगेश गीते यांनी केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्ञानदेवराव परनाटे, तरुण बगेरे, बादलसिंग सुकेडे, हरिभाऊ भालतिलक, धनंजय गावंडे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, संजय शेळके, संतोष अनासने, अतुल पवनीकर, योगेश अग्रवाल, गजानन चौधरी, शंकरराव ताथोड, गजानन चव्हाण आदींसह बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.