शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या मुद्यावर शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर!

By admin | Updated: March 14, 2016 01:25 IST

शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक; बुधवारी करणार आंदोलन.

अकोला: तीन वर्षांपासून सातत्याने नापिकीचा सामना करीत असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या मुद्यावर आता राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकारला घरचा आहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोला जिल्हा शिवसेनेने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठक रविवार दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत शासनाकडून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गत आठवड्यात शिवसेना पदाधिकार्‍यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली होती, असे सांगून जिल्हा प्रमुखांनी या मुद्यावर कोणताही समाधानकारक निर्णय अद्याप शासनाकडून घेण्यात आला नसल्याने शिवसेनेला शेतकर्‍यांच्या मुद्यावर आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा दिला. शिवसेनेतर्फे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत धरणे दिले जाणार असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह सर्व कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी अडचणीत असतील तेव्हा त्यांच्या मदतीला शिवसैनिक धावून जाईल. त्यासाठी आम्ही सत्तेत आहो किंवा नाही याचा विचार करणार नाही. आंदोलन करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसैनिकांचा जन्म झाला असल्याचे पिंजरकर म्हणाले. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार रामाभाऊ कराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपजिल्हा प्रमुख सेवकार ताथोड, बंडू ढोरे, उपमहापौर विनोद मापारी यांनी आढावा बैठकीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा यांनी तर संचालन योगेश गीते यांनी केले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्ञानदेवराव परनाटे, तरुण बगेरे, बादलसिंग सुकेडे, हरिभाऊ भालतिलक, धनंजय गावंडे, गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, संजय शेळके, संतोष अनासने, अतुल पवनीकर, योगेश अग्रवाल, गजानन चौधरी, शंकरराव ताथोड, गजानन चव्हाण आदींसह बहुसंख्य आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.