शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

एटीएसच्या कारवाईमुळे मुंबईत आयएसआयचे हस्तक भूमिगत

By admin | Updated: May 9, 2017 01:47 IST

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने आयएसआयचे जाळे उद्ध्वस्त केल्याने, मुंबईतील आयएसआयचे हस्तक भूमिगत झाल्याची शक्यता एटीएसकडून वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील तीन ते चार तरुणांचा यामध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, यूपी एटीएस त्यांच्या मागावर आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या जावेद इक्बाल नेवीवाला (३१), अल्ताफ कुरेशी (३३) यांना सोमवारी ट्रान्झिट रिमांडद्वारे लखनऊला रवाना करण्यात आले आहे. तेथे यूपी एटीएसने त्यांचा ताबा घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईत फैजाबादमधून आयएसआयचा हेर आफताब अली याच्यासह जावेद आणि कुरेशीला मुंबईतून अटक केली. जावेद हा आफताबला पैसे पुरवित होता. मुंबईतील आणखी तीन ते चार तरुण जावेदच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. हे तरुण आयएसआयसाठी काम करत असल्याचा संशय यूपी एटीएसला आहे. त्यानुसार, यूपी एटीएस महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने संशयितांना शोध घेत आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने ते भूमिगत झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सोमवारी जावेद आणि अल्ताफला यूपी एटीएसने ट्रांन्झिट रिमांडद्वारे न्यायालयात हजर करून ताबा घेतला. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीसाठी दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती यूपी एटीएसने दिली आहे. यूपी एटीएसच्या ताब्यात असलेल्या आफताबची कसून चौकशी सुरू आहे. त्यातून अनेक महत्त्वाची माहिती एटीएसच्या हाती लागली असल्याचेही यूपी एटीएसने सांगितले आहे. मंगळवापासून यूपी एटीएस तिघांचीही एकत्रित चौकशी करणार आहे.