शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

By admin | Updated: March 12, 2015 00:07 IST

अजब कारभार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी, ६0 टक्के लाभार्थ्यांबाबत संशय

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्र्थींच्या यादीत चक्क गर्भश्रीमंतांचा समावेश आहे. या यादीतील सुमारे ६0 टक्के कुटुंबांकडे स्वत:ची घरे आहेत. त्यांच्यातील काहींचा सावकारीचा व्यवसाय आहे, तर काहीजण चारचाकीतून फिरतात! त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे.१९९६ मध्ये ज्या कुटुंबांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश झाला आहे, त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी महादेवनगर परिसरात १0८ घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे, परंतु या घरकुलांमध्ये १0 टक्के लोकही वास्तव्यास नाहीत. या घरकुलांना अद्यापही वीज व पाण्याची सुविधा नाही. त्यांचा वापर आता अवैध व्यवसायांसाठी सुरू झाला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. या घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे मत व्यक्त करत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता.स्मशानभूमीनजीक बांधलेल्या ३९५ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ६0 टक्के कुटुंबीय इतरत्र स्वत:च्या घरात रहात असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. ज्यांना घरकुले देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून घरकुलासाठी लागणारी रक्कम भरून घेण्यात आली आहे. मात्र यातील काही कुटुंबे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शहरातील महत्त्वाच्या खासगी भूखंडांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या कुटुंबांनाही यातील घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. पालिकेचे पदाधिकारी हे भूखंड घशात घालण्याच्या कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण करून, खरोखरच ज्यांना गरज आहे, त्यांनाच या घरकुलांचे वाटप करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.विमानाने प्रवास!१९९६ मध्ये दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांतील एकास घर मिळाले. ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. घरकुलाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी मुंबई ते पुणे विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे.१९९६ मध्ये दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट असलेल्या कुटुंबांच्या आजच्या परिस्थितीचे फेरसर्वेक्षण करावे. जेणेकरून खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ होईल. जे घरकुलासाठी पात्र नसतील, त्यांना घरकुल मिळाले, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरोधात शासनाकडे तक्रार करु.- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा