शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

इस्लामपुरातील घरकुल योजनेच्या यादीत गर्भश्रीमंतही!

By admin | Updated: March 12, 2015 00:07 IST

अजब कारभार : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी, ६0 टक्के लाभार्थ्यांबाबत संशय

अशोक पाटील -इस्लामपूर  शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्र्थींच्या यादीत चक्क गर्भश्रीमंतांचा समावेश आहे. या यादीतील सुमारे ६0 टक्के कुटुंबांकडे स्वत:ची घरे आहेत. त्यांच्यातील काहींचा सावकारीचा व्यवसाय आहे, तर काहीजण चारचाकीतून फिरतात! त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी होत आहे.१९९६ मध्ये ज्या कुटुंबांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश झाला आहे, त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी महादेवनगर परिसरात १0८ घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे, परंतु या घरकुलांमध्ये १0 टक्के लोकही वास्तव्यास नाहीत. या घरकुलांना अद्यापही वीज व पाण्याची सुविधा नाही. त्यांचा वापर आता अवैध व्यवसायांसाठी सुरू झाला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही. या घरकुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे मत व्यक्त करत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता.स्मशानभूमीनजीक बांधलेल्या ३९५ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील ६0 टक्के कुटुंबीय इतरत्र स्वत:च्या घरात रहात असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. ज्यांना घरकुले देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून घरकुलासाठी लागणारी रक्कम भरून घेण्यात आली आहे. मात्र यातील काही कुटुंबे पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शहरातील महत्त्वाच्या खासगी भूखंडांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या कुटुंबांनाही यातील घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. पालिकेचे पदाधिकारी हे भूखंड घशात घालण्याच्या कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे फेरसर्वेक्षण करून, खरोखरच ज्यांना गरज आहे, त्यांनाच या घरकुलांचे वाटप करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.विमानाने प्रवास!१९९६ मध्ये दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांतील एकास घर मिळाले. ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. घरकुलाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी मुंबई ते पुणे विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे.१९९६ मध्ये दारिद्र्य रेषेखाली समाविष्ट असलेल्या कुटुंबांच्या आजच्या परिस्थितीचे फेरसर्वेक्षण करावे. जेणेकरून खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ होईल. जे घरकुलासाठी पात्र नसतील, त्यांना घरकुल मिळाले, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांविरोधात शासनाकडे तक्रार करु.- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा