शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाच्या वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढला !

By admin | Updated: June 9, 2016 02:06 IST

अकोला येथे पत्रपरिषदेत बच्चू कडू यांनी महावितरणसह राज्य सरकारवर आरोप केला.

अकोला : चार वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या आणि पैसे भरलेल्या शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीज जोडणी मिळत नाही. वीज जोडण्यांअभावी विदर्भात सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रहार संघटना जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित ह्यजनता दरबारह्णमध्ये ३00 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये प्रामुख्याने महावितरणसंबंधी सर्वाधिक तक्रारी आहेत. सन २0१२-१३ पासून अर्ज केल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतरही शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सिंचनाची कामे होत असली, तरी वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढत आहे, ही मोठी शोकांतिका असून, शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पैसे भरूनही कृषिपंपांना चार-पाच वर्षे वीज जोडणी मिळत नसेल, तर पुन्हा शेतकरी आत्महत्या वाढतील, असे आ. कडू यांनी सांगितले.जनता दरबारात महसूल, जिल्हा परिषदसह विविध विभागाच्या ३00 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १00 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, कुरणखेड येथील शहीद विनोद यशवंत मोहोड स्मारकासाठी जागा मागणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे विविध विषयांसंबंधी प्रशासनाची प्रचंड अनास्था असल्याचा आरोप आ.कडू यांनी यावेळी केला. यावेळी डॉ.दीपक धोटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाकधणे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.डॉ.रणजित पाटील यांचे काम शून्य ! गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांनी गेल्या पाच वर्षात बेरोजगार काय असतो, याबाबत कानोसाही घेतला नाही. अमरावतीमध्ये त्यांनी बेरोजगारांचा महारोजगार मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीच्या ह्यएजंटह्णचे काम केले असून,बेरोजगारांची थट्टा केली, असा आरोप आ.बच्चू कडू यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या काळात बेरोजगारांची अशी थट्टा करु नये, असे सांगत नोकर भरतीत समन्यायाचे वाटप झाले पाहिजे, यासाठी डॉ.पाटील आग्रह कधी धरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय प्रहार संघटनेने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र!विदर्भातील अनुशेषाबाबत सत्तेत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिटरभर रक्त आटवलं. सत्तेत आल्यानंतर विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी आता त्यांनी थेंबभर रक्त आटवलं पाहिजे; मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विदर्भ अनुशेषाचा विसर पडला आहे, अशी टीकादेखील आ.कडू यांनी यावेळी केली.