शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

कृषी पंपाच्या वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढला !

By admin | Updated: June 9, 2016 02:06 IST

अकोला येथे पत्रपरिषदेत बच्चू कडू यांनी महावितरणसह राज्य सरकारवर आरोप केला.

अकोला : चार वर्षांपूर्वी अर्ज केलेल्या आणि पैसे भरलेल्या शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीज जोडणी मिळत नाही. वीज जोडण्यांअभावी विदर्भात सिंचनाचा अनुशेष वाढत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रहार संघटना जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित ह्यजनता दरबारह्णमध्ये ३00 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये प्रामुख्याने महावितरणसंबंधी सर्वाधिक तक्रारी आहेत. सन २0१२-१३ पासून अर्ज केल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतरही शेतकर्‍यांना कृषिपंपांसाठी अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सिंचनाची कामे होत असली, तरी वीज जोडण्यांअभावी सिंचनाचा अनुशेष वाढत आहे, ही मोठी शोकांतिका असून, शेतकरी जगणार कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पैसे भरूनही कृषिपंपांना चार-पाच वर्षे वीज जोडणी मिळत नसेल, तर पुन्हा शेतकरी आत्महत्या वाढतील, असे आ. कडू यांनी सांगितले.जनता दरबारात महसूल, जिल्हा परिषदसह विविध विभागाच्या ३00 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १00 तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, कुरणखेड येथील शहीद विनोद यशवंत मोहोड स्मारकासाठी जागा मागणीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे विविध विषयांसंबंधी प्रशासनाची प्रचंड अनास्था असल्याचा आरोप आ.कडू यांनी यावेळी केला. यावेळी डॉ.दीपक धोटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाकधणे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.डॉ.रणजित पाटील यांचे काम शून्य ! गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांनी गेल्या पाच वर्षात बेरोजगार काय असतो, याबाबत कानोसाही घेतला नाही. अमरावतीमध्ये त्यांनी बेरोजगारांचा महारोजगार मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी संबंधित कंपनीच्या ह्यएजंटह्णचे काम केले असून,बेरोजगारांची थट्टा केली, असा आरोप आ.बच्चू कडू यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या काळात बेरोजगारांची अशी थट्टा करु नये, असे सांगत नोकर भरतीत समन्यायाचे वाटप झाले पाहिजे, यासाठी डॉ.पाटील आग्रह कधी धरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय प्रहार संघटनेने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र!विदर्भातील अनुशेषाबाबत सत्तेत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिटरभर रक्त आटवलं. सत्तेत आल्यानंतर विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी आता त्यांनी थेंबभर रक्त आटवलं पाहिजे; मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विदर्भ अनुशेषाचा विसर पडला आहे, अशी टीकादेखील आ.कडू यांनी यावेळी केली.