शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

सिंचनाचा फक्त खर्चच वाढला, सिंचन नाही!

By admin | Updated: October 5, 2014 01:15 IST

संग्रामपूर येथे पृथ्वीराज चव्हाण यांची अजित पवारांवर टिका.

संग्रामपूर (बुलडाणा) : सिंचनासाठी राज्याने ८२ हजार कोटी रुपयांपैकी ८0 हजार कोटी रुपये खर्च केले; मात्र सिंचनाची क्षमता त्या तुलनेमध्ये वाढली नाही. सिंचनाचे धोरण राबविण्यात चूक झाली अशी कुबूली देत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. भाज पच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे बुलडाण्याचे उपाध्यक्ष मनोज देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, रामविजय बुरूंगले, वा.रा. पिसे, अंजलीताई टापरे, अशोक हिंगणे, खालीकबापू देशमुख, डॉ.किशोर केला, तेजराव मारोडे, श्याम डाबरे, संतोष राजनकर, अंबादास बाठे, दयाराम वानखडे, राजू पाटील, डॉ.दलाल, युनूसखां अश्फाक आदींची उपस्थिती होती. आघाडीमुळे अनेक निर्णय घेतांना अडचणी आल्या. विशेषत: स्वच्छ प्रशासनाच्या संदर्भात निर्णय घे ताना अनेकांना अडचणीचे वाटले. आता आघाडी नाही आणि ज्या लाटेमुळे देशात सत्ता स्थापन झाली, ती लाट आता ओसरली आहे. त्यामुळे खिचडी सरकार निवडून देण्यापेक्षा काँग्रेससारख्या पक्षाला पूर्ण बहूमत देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जळगाव जामोद मतदारसंघा तील खारपाणपट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १४0 गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला. याचे श्रेय अन्य कुणी घेवू नये, केंद्रातून निधी आल्यास त्या योजनेचे श्रेय घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास होत आहे. पंधरा वर्षात आघाडीने राज्याची अ र्थव्यवस्था बळकट केली. त्यामुळे देशातील पहिल्या ४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडे मोदींशिवाय दुसरा चेहरा नाही. कोणातही नवा कार्यक्रम नाही. विकास कामांचे उद्घाटन करुन भाजप सरकार केवळ श्रेय लाटण्याचे काम करीत आहे. मराठा आरक्षण दे ताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला नंबर १ वर ठेवण्यासाठी, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खिचडी सरकार नको, तत्वशून्य आघाड्याही नको. काँग्रेसला प्रशासनाचा अनुभव आहे, म्हणून काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. प्रास्ताविक तेजराव मारोडे यांनी केले. यावेळी रामदास बोडखे, अंजलीताई टापरे, दयाराम वानखडे, राजू पाटील यांचीही समायोचित भाषणे झाली. *सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण धक्कादायकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणाचे थेट प्रसारण करण्याचा केद्र सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. नागपूरची ही मंडळी एका वर्णाचा व एका धर्माचा विचार करणारे आहेत, बहुजनांचा नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर करून, युती तुटल्याने आता दुध का दुध, व पाणी का पाणी होईल, अशी स् पष्टोक्तीही चव्हाण यांनी केली.