शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाचा फक्त खर्चच वाढला, सिंचन नाही!

By admin | Updated: October 5, 2014 01:15 IST

संग्रामपूर येथे पृथ्वीराज चव्हाण यांची अजित पवारांवर टिका.

संग्रामपूर (बुलडाणा) : सिंचनासाठी राज्याने ८२ हजार कोटी रुपयांपैकी ८0 हजार कोटी रुपये खर्च केले; मात्र सिंचनाची क्षमता त्या तुलनेमध्ये वाढली नाही. सिंचनाचे धोरण राबविण्यात चूक झाली अशी कुबूली देत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. भाज पच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जळगाव जामोद तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे बुलडाण्याचे उपाध्यक्ष मनोज देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, रामविजय बुरूंगले, वा.रा. पिसे, अंजलीताई टापरे, अशोक हिंगणे, खालीकबापू देशमुख, डॉ.किशोर केला, तेजराव मारोडे, श्याम डाबरे, संतोष राजनकर, अंबादास बाठे, दयाराम वानखडे, राजू पाटील, डॉ.दलाल, युनूसखां अश्फाक आदींची उपस्थिती होती. आघाडीमुळे अनेक निर्णय घेतांना अडचणी आल्या. विशेषत: स्वच्छ प्रशासनाच्या संदर्भात निर्णय घे ताना अनेकांना अडचणीचे वाटले. आता आघाडी नाही आणि ज्या लाटेमुळे देशात सत्ता स्थापन झाली, ती लाट आता ओसरली आहे. त्यामुळे खिचडी सरकार निवडून देण्यापेक्षा काँग्रेससारख्या पक्षाला पूर्ण बहूमत देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जळगाव जामोद मतदारसंघा तील खारपाणपट्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १४0 गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला. याचे श्रेय अन्य कुणी घेवू नये, केंद्रातून निधी आल्यास त्या योजनेचे श्रेय घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास होत आहे. पंधरा वर्षात आघाडीने राज्याची अ र्थव्यवस्था बळकट केली. त्यामुळे देशातील पहिल्या ४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडे मोदींशिवाय दुसरा चेहरा नाही. कोणातही नवा कार्यक्रम नाही. विकास कामांचे उद्घाटन करुन भाजप सरकार केवळ श्रेय लाटण्याचे काम करीत आहे. मराठा आरक्षण दे ताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला नंबर १ वर ठेवण्यासाठी, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खिचडी सरकार नको, तत्वशून्य आघाड्याही नको. काँग्रेसला प्रशासनाचा अनुभव आहे, म्हणून काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. प्रास्ताविक तेजराव मारोडे यांनी केले. यावेळी रामदास बोडखे, अंजलीताई टापरे, दयाराम वानखडे, राजू पाटील यांचीही समायोचित भाषणे झाली. *सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण धक्कादायकराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणाचे थेट प्रसारण करण्याचा केद्र सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. नागपूरची ही मंडळी एका वर्णाचा व एका धर्माचा विचार करणारे आहेत, बहुजनांचा नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर करून, युती तुटल्याने आता दुध का दुध, व पाणी का पाणी होईल, अशी स् पष्टोक्तीही चव्हाण यांनी केली.