शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महावितरणच्या कृषिपंप जोडण्यांमध्ये अनियमितता

By admin | Updated: July 13, 2014 21:56 IST

प्रलंबित जोडण्यांपैकी ५0 टक्केच जोडण्या दिल्या, उच्चस्तरीय चौकशी होणार

अकोला : राज्यभरात कृषिपंपांना जोडणी देण्याच्या प्रकारामध्ये मोठय़ाप्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणांची आता महावितरणच्यावतीने उच्चस्तरीय चौकशी करून झाडाझडती घेण्यात येणार आहे. महावितरणने केलेल्या तपासणीत प्रत्यक्ष प्रलंबित जोडण्यांपैकी ४५-५0 टक्के जोडण्या देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. गत पाच वर्षांत दहा लाखापेक्षा जास्त कृषिपंपांना वीज जोडणी देऊनही १ लाख ६७ हजार कृषिजोडण्या प्रलंबित का आहेत, याची तपासणी केल्यानंतर कृषी जोडण्या दिल्यानंतरही प्रलंबित दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या मागील कारणाचा आता शोध घेण्यात येणार आहे. याकरिता सर्व प्रलंबित अर्जांची तपासणी करून यातील सत्यस्थिती शोधण्याची प्रक्रिया मुख्यालय पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. मुख्यालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, अशा पद्धतीची खोटी आकडेवारी देऊन कंत्राटदारांसोबत संगनमत करून होणार्‍या कामांचा शोध घेण्यात येणार आहे. मुख्यालयातील पथकांनी राज्यभरातील ४३७ प्रलंबित जोडण्या तपासल्यावर त्यातील ७२ जोडण्या सुरू झालेल्या असून, त्यांना देयकेही देण्यात आली आहेत. ८0 जोडण्या देण्यात आल्या असून, त्यांना अद्याप देयके देण्यात आली नाहीत. ४२ जोडण्या देण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यात नांदेड परिमंडळातील तपासलेल्या २६ प्रलंबित जोडण्यांपैकी १५ जोडण्या देण्यात आल्याचे आढळून आले. नाशिक परिमंडळात २५ जोडण्यांपैकी १५ जोडण्या देण्यात आल्या.