शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत

By admin | Updated: April 13, 2016 17:46 IST

बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली.

  - मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी तर मैदानासाठी वापरण्यात येईल तितके पाणी दुष्काळग्रस्तांना देणार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  IPL मधील मुंबई , पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार असल्याचे  पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे महाराष्ट्रात आयपीएल स्पर्धेचे सामने खेळवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यानन्यायालयात सांगितले. बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली. मात्र, महाराष्ट्रातील सामने इतरत्र खेळवण्याविषयी मौन बाळगले. 
दरम्यान, नागपूरातील सामने अन्यत्र हलवण्याबाबत विदर्भ क्रिकेट असोसिएशनबोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही बीसीसीआयने सांगितले. या सुनावणीदरम्यान पुणे संघाच्या वकिलांनी त्यांच्या संघाचे सामने पुण्याबाहेर खेळविण्यास विरोध दर्शवला. हे सामने इतरत्र खेळवले गेल्यास संघाचा पाठिंबा कमी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आयपीएलची तिकीटे विकली गेली आहेत. याशिवाय, आयपीलमध्ये अनेक गुंतवणुकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले असल्याने आयपीएल सामने महाराष्ट्राच खेळवून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी बीसीसीआयने केली.
 
क्रिकेट संघटनांमध्ये सल्लागार म्हणून फक्त राजकारण्यांचीच वर्णी कशी काय लागते?, या राजकारण्यांशिवाय क्रिकेट संघटनांचा कारभार चालू शकत नाही का, असा खडा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला विचारला. 
न्यायालयाने यावेळी बीसीसीआयकडून एमसीएला इतर संघटनांच्या तुलनेत देण्यात येणाऱ्या अधिक प्राधान्याचा मुद्दाही उपस्थित केला. याशिवाय, एमसीएने त्यांच्या उत्त्पन्न आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा, असे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.