शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

३५ हजार कोटींची राज्यात गुंतवणूक

By admin | Updated: August 9, 2015 04:08 IST

डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जगात अव्वल मानली जाणारी फॉक्सकॉन ही कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे.

मुंबई : डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जगात अव्वल मानली जाणारी फॉक्सकॉन ही कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत शनिवारी स्वाक्षरी झाली. राज्यातील ही आजवरची एकाचवेळी होत असलेली सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, संशोधन आणि विकास हे कार्य या प्रकल्पात होईल. या ठिकाणी ५० हजार नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर किंवा तळेगावनजीक (जि. पुणे) हा प्रकल्प उभारला जाईल. दोन्ही ठिकाणी कंपनीने पाहणी केली असून, जागेची निश्चिती लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ‘मेक इन इंडिया’चे आणि आम्ही त्यास अनुसरून सुरू केलेले ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरीक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, उद्योग सचिव अपूर्व चंद्र, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)आयफोन, आयपॅडची निर्मिती...अ‍ॅपल कंपनीची आयपॅड आणि आयफोन ही उत्पादने तसेच अन्य नामवंत कंपन्यांसाठी मोबाईल, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही नामवंत कंपनी आहे. तीत १० लाख लोक काम करतात. १९७४ साली तैवानमध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने १९८८ पासून चीनमध्ये गुंतवणूक सुरू केली. फॉर्चुनने २०१४ मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम ५०० कंपन्यांमध्ये फॉक्सकॉनला ३२ वे नामांकन प्राप्त झाले होते. फॉक्सकॉनच्या समुहात १४ अन्य कंपन्या आहेत. गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये भारतात १० वर्षांत २ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या ५ वर्षांत एकट्या महाराष्ट्रात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.