शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुंतवणुकीवर निर्बंध!

By admin | Updated: October 28, 2015 02:37 IST

काही सार्वजनिक उपक्रमांनी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता सर्वच उपक्रमांच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत.

यदु जोशी, मुंबई काही सार्वजनिक उपक्रमांनी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता सर्वच उपक्रमांच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. उपक्रमांकडे असलेला अतिरिक्त निधी कशा पद्धतीने गुंतवायचा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे शासनाने घालून दिली आहेत. सार्वजनिक उपक्रमांकडून (महामंडळे आदी) विविध वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करताना गैरव्यवहार होत असून, त्याची कार्यपद्धती (मोड्स आॅपरेंडी) कशी आहे, याची विस्तृत माहिती असलेला अहवाल मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी राज्य शासनाला गेल्या मार्चमध्ये दिला होता. या पार्श्वभूमीवर, खडबडून जागे झालेल्या राज्याच्या वित्त विभागाने आज गुंतवणुकीबाबत मार्गदर्शक तत्त्वेच जारी केली आहेत. काय झाले घोटाळेआजचा निर्णय ज्या कारणाने राज्य सरकारच्या वित्त विभागाला घ्यावा लागला ते कारण अतिशय धक्कादायक आहे. मुंबईतील दोन बड्या बँकांमध्ये राज्य शासनाच्या एका सार्वजनिक उपक्रमाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मुदत ठेवीच्या रूपाने केलेल्या या गुंतवणुकीतील पैसा बँकेच्या अधिकाऱ्यांनी बेमालूमपणे इतरत्र वळविला. मुदत ठेव दोन वर्षांसाठी असेल तर हा पैसा काही कंपन्यांना एक वर्षासाठी परस्पर कर्जाऊ देण्यात आला आणि काही बँक अधिकाऱ्यांना त्यात आर्थिक फायदा झाल्याची प्रकरणे समोर आली. हे सार्वजनिक उपक्रम मुंबईमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मलबार हिलमध्ये शाखा असलेल्या एका बँकेसह दोन बँकांचा या घोटाळ्यात हात असल्याचे समोर आले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या घोटाळ्यात त्या सार्वजनिक उपक्रमाचे काही अधिकारी सामील असण्याची शक्यता आहे. बँक आणि उपक्रमाच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कडक कारवाई झाली नाही. याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची पार्श्वभूमीदेखील आजच्या निर्णयाला आहे. या महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट परस्पर लावण्यात आली होती. ५० महामंडळे व उपक्रमराज्यात सरकारी महामंडळे, मंडळे व शासकीय उपक्रमांची संख्या ५०च्या घरात आहे. यात वर्षाला अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या महावितरण, रस्ते विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ व ‘सिडको’ यांच्याखेरीज ठरावीक समाजघटकांच्या विकासासाठी स्थापन केलेली व काही कोटींचे बजेट असलेली छोटी महामंडळेही आहेत. काही महामंडळे सेवा वा वस्तूंचा व्यवहार करून स्वत:चा महसूल स्वतंत्रपणे कमावतात तर इतरांना अर्थसंकल्पातून पैसा दिला जातो. मात्र या सर्वांवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे व कोणालाही संपूर्ण स्वायत्तता नाही.वित्त विभागाचे आदेश सार्वजनिक उपक्रमांनी केलेल्या गुंतवणुकीची तपासणी दर दोन-तीन महिन्यांनी बँकेत करावी. उपक्रमांनी केलेल्या गुंतवणुकीचा पैसा बँकांना परस्पर दुसरीकडे कर्ज वा अन्य स्वरूपात वळविता येणार नाही. त्यासाठी सार्वजनिक उपक्रमांकडून लेखी परवानगी घ्यावी लागेल. शेड्युल बँकेपैकी स्टेट बँक व त्याची असोसिएट बँक, राष्ट्रीयीकृत बँक व किमान ४ हजार कोटी नक्त मत्ता (नेट वर्थ) असलेल्या बँकेतच गुंतवणूक करता येईल.अतिरिक्त निधी गुंतविण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य असे व्यावसायिक मूल्यमापन करावे. शासनाकडून मान्य करण्यात आलेल्या वित्तीय संस्थेतच गुंतवणूक करावी.किमान एक वर्ष आणि कमाल तीन वर्षांसाठीच मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करता येईल.ठेवींसंदर्भातील मूळ पावत्या/प्रमाणपत्रांची खातरी करणे अनिवार्य.संबंधित बँकेचे वा वित्तीय संस्थेचे सील व अधिकाऱ्याची स्वाक्षरी योग्य असल्याची खातरजमा करावी.मुदतठेवींवर ओव्हरड्राफ्ट घेण्याचे टाळावे. अपरिहार्य परिस्थितीत तो घ्यावयाचा असल्यास संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय घेऊ नये. सार्वजनिक उपक्रमांनी केलेली गुंतवणूक आणि त्यावर प्राप्त व्याजाची माहिती याचा त्रैमासिक अहवाल शासनास द्यावा.