शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

३० कोटींच्या बोगस बीटी बियाण्यांचा तपास थंडबस्त्यात

By admin | Updated: June 26, 2014 01:21 IST

कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पश्चिम विदर्भातील बोगस बियाणे-खते विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध १० पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले. परंतु पोलिसांना ‘क्रेडिट आणि

१० गुन्हे दाखल : पोलिसांना ‘इन्टरेस्ट’ नाही, कृषी खात्याचे परिश्रम व्यर्थ यवतमाळ : कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पश्चिम विदर्भातील बोगस बियाणे-खते विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. त्यांच्याविरुद्ध १० पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले. परंतु पोलिसांना ‘क्रेडिट आणि इन्टरेस्ट’ नसल्याने या गुन्ह्यांचा तपास थंडबस्त्यात पडला आहे. पर्यायाने कृषी विभागाचे परिश्रम व्यर्थ ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची विक्री होते. यावरील नियंत्रणासाठी विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात ६२ पथके कार्यरत आहेत. कोणत्या भागात बोगस बियाणे आणले जात आहे, त्याचे विक्रेते, खरेदीदार कोण याची माहिती काढणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि रंगेहात पकडण्याची कामगिरी अगदी पोलिसांप्रमाणे कृषी विभागाच्या पथकांमार्फत केली जात आहे. बोगस बियाणे विक्रीची खातरजमा करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी अनेक कृषी केंद्रांमध्ये स्वत: शेतकरी (बनावट ग्राहक) बनूनही गेले. त्यात आतापर्यंत ३० कोटी रुपयांचे बोगस बियाणे, खते जप्त करण्यात आली. पुसद शहर, यवतमाळ शहर, राळेगाव, पांढरकवडा, बाभूळगाव, वाशिम, बडनेरा, मोर्शी, आकोट, खामगाव या दहा ठिकाणी बियाणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरण तयार करून पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. आरोपी कोण, त्याचा पत्ता, पंचनामे, साक्षीदार व अन्य सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु त्यानंतरही पोलिस तपासाला वेग नसल्याचे आढळून आले आहे. अनेक ठिकाणी आपल्याला श्रेय मिळणार नाही, म्हणून पोलिसांनी तपासच थंडबस्त्यात ठेवला आहे. यातील हवे असलेले आरोपी चक्क पोलीस ठाण्यासमोरुन जात असतानाही पोलिसांनी त्यांना अटक करण्याची तसदी घेतली नाही. याचा प्रत्यय कृषी विभागाला यवतमाळ शहरात आला. कित्येक ठिकाणी तर संबंधित पोलिसांनी कृषी विभागाला सहकार्यच केले नाही. त्यासाठी थेट एसडीपीओ, एसपींना संपर्क करावा लागला. त्यानंतर कुठे कृषी अधिकाऱ्यांना धाडीसाठी मदत मिळाली. राळेगावच्या ठाणेदाराने तर ‘तुम्ही बोगस बियाणे विक्रेत्याला पकडलेच कसे, आमचे काम तुम्ही करायला लागले का’ अशा शब्दात वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याला सुनावले. राळेगाव पोलीस सहकार्य करीत नसल्याचे पाहून अखेर कारवाईसाठी यवतमाळहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)