शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या १०५६ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:15 IST

राज्यात दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचारासंदर्भात वर्षभरात अडीच हजार गुन्हे

राजेश निस्ताने मुंबई : राज्यात दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचारासंदर्भात वर्षभरात अडीच हजार गुन्हे (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल झाले असून त्यातील १ हजार ५६ गुन्ह्यांचा तपास पोलिसांच्या स्तरावर प्रलंबित आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने गृहखात्याला पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालातूनच आकडेवारी उघड झाली आहे.गेल्या वर्षभरात राज्यातील नऊ पोलीस परिक्षेत्रात अनुसूचित जाती व जमातीबाबत दोन हजार १५३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक ४६७ गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रात आहेत. त्या खालोखाल अमरावती, नाशिक, औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्राचा क्रमांक लागतो. राज्यात अशा अत्याचाराचे सर्वात कमी ३४ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. दलित, आदिवासी समाजातील व्यक्तींवरील अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा वेगाने तपास होऊन ते न्यायप्रविष्ट होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे.अशी आहेतप्रलंबिततेची कारणेगुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहण्यामागे पोलिसांकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. उच्च न्यायालयात याचिका, अपिल प्रलंबित असणे, आरोपींची अटक बाकी असणे,अधिक पुरावा गोळा करणे,साथीदार तपासणी, चार्जशिटला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा, अपर पोलीस अधीक्षक, सरकारी अभियोक्त्यांचे वेळेत अभिप्राय प्राप्त न होणे, जात प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध न होणे आदी कारणांचा समावेश आहे. मदतीच्या रकमेसाठीही प्रतीक्षाचजातीय अत्याचाराचा बळी ठरलेल्या दलित, आदिवासी समाजातील व्यक्तीला शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून मदतीची रक्कम दिली जाते. परंतु पोलीस व संबंधित यंत्रणेकडून वेळीच पाठपुरावा होत नसल्याने या मदतीच्या रकमेसाठीही अत्याचारग्रस्तांना वर्षोगणती प्रतीक्षा करावी लागते. प्रलंबित गुन्हे हे गृहखात्याचे अपयश मानले जाते.