शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रेल्‍वे प्रवाशांना झालेल्‍या त्रासाची चौकशी करा- आशिष शेलार

By admin | Updated: June 22, 2016 16:02 IST

मुंबईत पावसाला सुरुवात होताच गेले काही दिवस रेल्‍वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्‍तव विस्कळीत होत असल्‍याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे

ऑनलाइन लोकमत

 मुंबई, दि. 22 – मुंबईत पावसाला सुरुवात होताच गेले काही दिवस रेल्‍वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्‍तव विस्कळीत होत असल्‍याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. याप्रकरणी तात्‍काळ मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू यांची आज दिल्‍ली येथे जाऊन भेट घेतली. रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभू एकीकडे प्रवाशांच्‍या सेवेचा दर्जा सुधारण्‍याचा प्रयत्‍न करीत असताना रेल्‍व्‍ेा प्रशासनाच्‍या चुकांमुळे, अधिका-यांच्‍या दिरंगाईमुळे जर प्रवाशांचे हाल होत असतील तर अशा अधिका-यांची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्‍वेमंत्र्यांकडे केली.

रेल्‍वेने प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीच्‍या उपाययोजना केल्‍या आहेत. तरीही  पावसाला सुरुवात होतानाच हलक्‍याशा पावसाने गेले दोन दिवस रेल्‍वेचे वेळापत्रक विस्‍कळीत झाले होते . रेल्‍वे अधिकारी जरी कामे केली असे सांगत असले तरी प्रत्‍यक्षात प्रवाशांचेही हाल होत आहेत.

काल मध्‍य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जे. जे. हॉस्पिटलकडे निघालेल्‍या एका माहिलेची प्रसूतीही रेल्‍वे गाडीतच झाली. तर माहीम रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रातील बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. त्‍यामुळेही प्रवाशांचे हाल झाले. तसेच गेल्‍या आठवडाभरात हार्बर आणि मध्‍य रेल्‍वेच्‍या ओव्हरहेड वायर तुटल्याचे प्रसंग वारंवार घडत असून तांत्रिक बिघाडामुळे रेल्‍वेचा वारंवार खोळंबा होत आहे.
 
या प्रकरणी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तात्‍काळ दिल्‍ली येथे जाऊन रेल्‍वे मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करावी. तसेच रेल्‍वे अधिका-यांना पावसाळ्यात आपत्‍कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्‍याचे निर्देश देण्‍यात यावेत. ज्‍या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पाणी साचण्‍याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी खरबदारीच्‍या उपायोजना करण्‍यात याव्‍यात, तसेच आप्‍त्‍कालीन परिस्थिती निर्माण झाल्‍यास प्रवशांना वेळीच सूचना देण्‍यात याव्‍यात. काही उपनगरीय रेल्‍वे स्‍टेशनवर फलाटांच्‍या दुरुस्‍तीची व ब्रिजची कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. तर संपूर्ण मान्‍सून  पूर्व तयारीचा रेल्‍वेच्‍या वरिष्ठ अधिका-यांनी फेरआढावा घेऊन त्‍याचा अहवाल रेल्‍वे मंत्रालयाने मागवून घ्‍यावा. त्‍यानंतरही प्रशासनाच्‍या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तर त्‍याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिका-यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा विविध मागण्‍या करीत रेल्‍वेमंत्र्यांशी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्‍वे प्रवाशांच्‍या समस्‍यांबाबत चर्चा केली.