शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

लेखनात स्वातंत्र्याचा आविष्कार महत्त्वाचा !

By admin | Updated: December 29, 2014 05:43 IST

चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

डोंबिवली : ‘चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा आनंद वाटतो. परंतु ज्या जीवनाचा गौरव झाला त्याच्याविषयी अंतर्मुख होऊन भाष्य करताना रसिक प्रेक्षकांशी मन मोकळे करताना सांगावेसे वाटते की, लेखनामध्ये आविष्कार स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्या लेखणीला अर्थ नसतो,’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी काढले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.कलावंताने प्रामाणिक राहावे, तसेच साहित्यिकाने स्वातंत्र्याचे जतन करावे, असे मतकरी म्हणाले. ‘सर्वसामान्य कलावंत आणि साहित्यिक म्हणून जगताना त्यातील ‘सामान्य’ असणे आवश्यक असून त्यासाठी स्वच्छ प्रतिमा असणेही तेवढेच महत्त्वाचे असते. साहित्यिकाला सुचणाऱ्या कल्पना निर्भीडपणे मांडण्याचेही स्वातंत्र्य असायला हवे, हुकूमशाहीला आव्हान देणे, त्यासाठी न्यायाची लढाई करणे अत्यावश्यक आहे,’ असे ते म्हणाले. ‘साहित्यक्षेत्रात काही गट सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही,’ अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. ‘जे लिखाण स्वत:ला समाधान-आनंद देऊ शकत नसेल ते लिखाण कसले, त्यामुळे असा अप्रामाणिक कलावंत नसावा,’ असे ते म्हणाले. ‘सचोटीने वागत आनंद कशात आहे हे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ लोकाश्रयातून आणि त्यांच्याच देणगीतून देण्यात आलेल्या या जीवनगौरवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,’ असे ते म्हणाले. झोपडपट्टीतील मुलांमध्येही कलागुण असतात, त्यांनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘वंचितांची रंगभूमी’ निर्माण करण्याचा चंग मतकरींनी बांधला आहे. ३० डिसेंबरपासून ठाण्यातील ‘समता विचार’ या संस्थेच्या सहकार्याने त्याच दृष्टीने काही निवडक भागातील २० गटांमधून चांगले कलाकार रंगभूमीला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निवडीची प्राथमिक फेरी घाणेकर नाट्यगृहात होणार असून, अंतिम निवड ही ४ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर (गौरवशब्द), डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, सुधीर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मतकरींना डॉ. आगाशेंच्या हस्ते देण्यात आला. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याच निमित्ताने प्रतिभा मतकरी (पत्नी) यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.