शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा; २२ मेपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:29 IST

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना २०२१ मध्ये एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले.

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला गोवण्यात येऊ नये, यासाठी शाहरूखकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर २२ मेपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी दिले.

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना २०२१ मध्ये एनसीबीमध्ये नियुक्त करण्यात आले. खंडणी, लाच प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची हमी दिल्यावर उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने वानखेडे यांच्यावर सोमवारपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. 

युक्तिवादात काय?भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम १७ (ए) अंतर्गत  सीबीआयने गुन्हा घडल्यानंतर चार महिन्यांत चौकशी करणे अपेक्षित आहे. गुन्हा ऑक्टोबर २०२१ मध्ये घडला. आतापर्यंत सीबीआयने काहीही केले नाही, असा युक्तिवाद वानखेडे यांच्यातर्फे रिझवान मर्चंट यांनी केला.

सीबीआयचा आक्षेप...-     वानखेडे यांच्या याचिकेवर सीबीआयने आक्षेप घेतला. वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण हवे असल्यास त्यांच्याकडे अन्य पर्याय आहे, असे सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी न्या. शर्मिला देशमुख व न्या. ए. डॉक्टर यांच्या खंडपीठाला सांगितले. -     वानखेडे यांच्यावर कारवाई करण्यास दोन दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीस सुरुवात केली, असे पाटील यांनी म्हटले. -     मात्र, गुन्हा घडल्यानंतर चार महिन्यांत चौकशी का केली नाही, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित करताच पाटील यांनी सूचना घेण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ मागितली.

एनसीबीने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे व चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बदला घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी न्यायालयात केला. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली विशेषत: एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, असा दावा वानखेडे यांनी केला आहे. ‘सिंह हे एसआयटीचे प्रमुख होते आणि ते स्वत:च्याच वर्तनाची चौकशी करीत आहेत. स्वत:ची काही कृत्ये झाकण्यासाठी सिंग प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते याचिकादाराचा छळ करीत आहेत. एनसीबी सोडून गेल्यानंतरही सिंह त्यांचा छळ करीत आहेत, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय