शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

शेतकऱ्यांना व्याजमाफी; कर्जवसुलीला स्थगिती

By admin | Updated: September 6, 2015 05:04 IST

राज्यात दुष्काळसदृशस्थिती असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांकडील कृषी कर्जाला स्थगिती देताना त्यावरील व्याज माफ केले जाईल आणि वीज बिल वसुलीलादेखील स्थगिती दिली जाईल

मुंबई : राज्यात दुष्काळसदृशस्थिती असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांकडील कृषी कर्जाला स्थगिती देताना त्यावरील व्याज माफ केले जाईल आणि वीज बिल वसुलीलादेखील स्थगिती दिली जाईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. दुष्काळसदृश गावांची संख्या ८ हजारांवरून १४ हजार गावांपर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाईल. तसेच, शहरांमध्ये व्यावसायिक वा इतर शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शुल्कही माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळात लवकरच याबाबतचे निर्णय घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्'ांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याशिवाय, मराठवाड्याच्या इतर काही जिल्'ांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लातूर शहराला उजनी धरणाचे पाणी रेल्वेने पुरविण्याची योजना तयार करण्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या मनात वेगळेचदुष्काळाबाबत ज्या मुद्यांवर विरोधी पक्ष आज आवाज उठवित आहेत तो दुष्काळग्रस्तांचा प्रातिनिधीक आवाज नाही. विरोधी पक्ष म्हणतात त्यापेक्षा वेगळे तेथील लोकांच्या मनात आहे आपण तेच आपल्या दौऱ्यात समजून घेतले. विरोधी पक्ष करीत असलेल्या बहुतेक मागण्या सरकारने आधीच मंजूर केलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याचे हक्काचे पाणी आधीच्या सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात पळविल्याने आजची स्थिती उद्भवली आहे,अशी टीकाही त्यांनी केली. उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्'ांमधील बहुसंख्य गावे ‘दुष्काळसदृश’ असतील. मात्र, गाव हा घटक मानून पैसेवारीचे निकष लावले जाणार असल्याने अन्य जिल्'ांमधील अनेक गावांचाही त्यात समावेश असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पैसेवारीची अंतिम आकडेवारी १५ सप्टेंबरला आल्यानंतर ‘दुष्काळसदृश’गावे जाहीर करण्यात येतील. आणखी ‘आयएएस’ना जबाबदारीदुष्काळग्रस्त भागातील शासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी शासनाच्या विविध महामंडळांवर असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन-तीन दिवस पाठविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) गरज पडली तर अधिवेशन..दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. सध्या तशी आवश्यकता वाटत नाही; पण गरज वाटली तर अधिवेशनही घेऊ; पण विरोधी पक्षांना तर अधिवेशनात गोंधळच करायचा असतो ना! असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.