शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंतरजिल्हा बदली प्रस्ताव ९ महिन्यांपासून रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:43 IST

राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात

- जमीर काझी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात पडून आहे. त्याबाबत सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही की, कॉन्स्टेबलची बदली करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना बहाल केलेले नाहीत. त्यामुळे त्यासंबंधी जिल्हा मुख्यालयाकडून मागविलेले अर्ज सहा महिन्यांपासून राज्य मुख्यालयातच पडून आहेत. आंतरजिल्हा बदली न करण्याची अट कमी करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असलेल्यांची बदली, महासंचालकांच्या स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून अर्ज मागविले होते. मात्र, त्यासंबंधी डीजींना अधिकार देण्याला गृहविभागाने संमती न दिल्याने अडचण झाली आहे. २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना ज्या पोलीस घटकांत नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य घटकांमध्ये आंतरजिल्हा बदली करायची नाही, असा नियम सरकारने घेतलेला आहे. मात्र ही अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी २८ आॅक्टोबरला गृहविभागाकडे पाठविला आहे. मात्र, गृहविभागाच्या पोल-५(ब)कडील फाइल अद्याप धूळ खात पडून आहे. निर्णय प्रलंबितसेवा नियमातील अट शिथिल करण्याबाबतच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळेपर्यंत गरजंूची बदली करण्यासाठी अर्ज मागविले होते. मात्र, त्यालाही गृहविभागाने मान्यता दिलेली नाही. - सतीश माथुर, पोलीस महासंचालक