शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

आंतरजिल्हा बदली प्रस्ताव ९ महिन्यांपासून रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:43 IST

राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात

- जमीर काझी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या पोलिसांना आंतरजिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाइल गेल्या नऊ महिन्यांपासून गृहविभागात पडून आहे. त्याबाबत सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही की, कॉन्स्टेबलची बदली करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना बहाल केलेले नाहीत. त्यामुळे त्यासंबंधी जिल्हा मुख्यालयाकडून मागविलेले अर्ज सहा महिन्यांपासून राज्य मुख्यालयातच पडून आहेत. आंतरजिल्हा बदली न करण्याची अट कमी करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असलेल्यांची बदली, महासंचालकांच्या स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरातून अर्ज मागविले होते. मात्र, त्यासंबंधी डीजींना अधिकार देण्याला गृहविभागाने संमती न दिल्याने अडचण झाली आहे. २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना ज्या पोलीस घटकांत नियुक्ती झाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य घटकांमध्ये आंतरजिल्हा बदली करायची नाही, असा नियम सरकारने घेतलेला आहे. मात्र ही अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी २८ आॅक्टोबरला गृहविभागाकडे पाठविला आहे. मात्र, गृहविभागाच्या पोल-५(ब)कडील फाइल अद्याप धूळ खात पडून आहे. निर्णय प्रलंबितसेवा नियमातील अट शिथिल करण्याबाबतच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळेपर्यंत गरजंूची बदली करण्यासाठी अर्ज मागविले होते. मात्र, त्यालाही गृहविभागाने मान्यता दिलेली नाही. - सतीश माथुर, पोलीस महासंचालक