शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहच जाती उदध्वस्त करेल

By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST

कुमार शिराळकर : सांगलीतील जाती अंत परिषदेत बारा ठराव मंजूर

सांगली : आंतरजातीय विवाहच जाती-व्यवस्थेची उतरंड उद्ध्वस्त करून समाजात समानता निर्माण करेल, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य कॉ़ कुमार शिराळकर यांनी केले़सांगलीत जाती अंत संघर्ष समितीतर्फे ‘जाती अंत परिषद’ झाली़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिराळकर बोलत होते़ परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रा़ जी़ के. ऐनापुरे होते़ शिराळकर पुढे म्हणाले की, हजारो वर्षांच्या परंपरेतून वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते़ काही कालावधीनंतर त्या परिस्थितीमध्ये बदल होतो; पण जात एवढी चिवट आहे की, ती आजही टिकून राहिली आहे़ जाती व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आवाज उठविला पाहिजे़ जातीय व्यवस्थेला आणि प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध होत आहे़ जातीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बुध्दी आणि नीतीमत्ता यांची जोड असणारी माणसं पुढे आली पाहिजेत़ आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले तरच जातीव्यवस्था संपण्यास मदत होणार आहे़प्रा़ डॉ़ बाबूराव गुरव म्हणाले की, जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा पराभव करायचा असेल, तर शिक्षण व ज्ञान महत्त्वाचे आहे़ थोर संत, समाजसुधारकांपासून जाती अंताची लढाई सुरू आहे़ या लढाईस बळ देण्यासाठी विज्ञान आणि व्यवहाराच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे़कॉ़ धनाजी गुरव म्हणाले की, समाजात आजही जातीव्यवस्थेचे मुळे खोलवर रुजली आहेत़ चतुर्थ श्रेणीतील कामगार दलित आणि बहुजन समाजातीलच आहेत़ कुणीही सहजासहजी जात सोडण्यास तयार नसल्यामुळेच जातीव्यवस्थेविरोधात लढणे मोठे आव्हान आहे़ बुध्द, महावीर, फुले, शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वाचा अभ्यास करून ती तत्त्वे रूजविल्यास समाजात निश्चित परिवर्तन होऊन जाती अंत होऊ शकतो.अ‍ॅड़ के. डी़ शिंदे म्हणाले की, मध्यमवर्गीयांच्या पोटाचा प्रश्न सुटल्याशिवाय समाजात परिवर्तन होणार नाही़ आंतरजातीय, धर्मीय विवाह हे जाती अंतासाठीचे टाकलेले पहिले पाऊल आहे़़प्रा़ जी़ के. ऐनापुरे म्हणाले की, जाती अंत संघर्ष परिषद अत्यावश्यक असून, जाती अंताकडे टाकलेले चांगले पाऊल आहे़ पुरोगामी सर्व संघटनांनी गट-तट विसरुन जाती अंतासाठी एकत्र येण्याची गरज आहे़यावेळी कॉ़ शैलेंद्र कांबळे, प्रा़ माधुरी देशमुख यांनीही मते मांडली़ यावेळी जिल्हा सचिव उमेश देशमुख, जाती अंत परिषदेचे निमंत्रक प्रा़ प्रताप जगदाळे, आनंद विंगकर, युक्रांदचे युवराज मगदूम, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी उपस्थित होते़ कॉ़ कबीर मुलाणी यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)आठवलेही जातीयवाद्यांच्या पंक्तीला : गुरवदलित आणि बहुजन समाजाचे नाव घेऊन लढणाऱ्या संघटनांचे नेतेही स्वार्थासाठी जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी करीत आहेत़ खासदार रामदास आठवलेही आपल्या स्वार्थासाठी दलित समाजाच्या व्यथा बाजूला ठेवून जातीयवादी पक्षांच्या पंगतीला जाऊन बसले आहेत़ दलित, बहुजन समाजातील नेत्यांच्या या भूमिकांमुळे जाती अंत कसा होणार, अशी खंत कॉ़ धनाजी गुरव यांनी व्यक्त केली़परिषदेतील ठराव...दलित, आदिवासींची मालमत्ता हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-अत्याचार पीडितांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी-आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या संसारासाठी खास निधीची शासनाने तरतूद करावी़-जातीआधारित अत्याचारांना आळा घालण्यात कुचराई करणाऱ्या व तडजोडीसाठी दबाव आणणाऱ्या धनदांडग्यांवर, पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अंदाजपत्रकीय निधीची तरतूद करून ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदे करावेत-राष्ट्रीय भूमी सुधार धोरणाच्या मसुद्यात नमूद केल्यानुसार सर्व प्रकारच्या जमीन उपयोगांची पाहणी करून आणि खासगी जमिनीवरील सिलींगची मर्यादा पुनर्रचित करून भूमिहीनांना जमिनींचे फेरवाटप करावे-पीडित व त्यांचे साक्षीदार यांच्या अधिकारांची कायद्यामध्ये व्याख्या करावी