शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पालकमंत्र्यांऐवजी आता ‘पालक आमदार’, प्रस्ताव विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:58 IST

स्वत:च्या खात्याची जबाबदारी सांभाळून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक मर्यादा येतात. तातडीने निर्णय होत नाहीत, मंजूर निधी खर्च करण्यासाठी पाठपुरावा करता येत असल्याने होत नाही; म्हणून ‘पालक आमदार’ संकल्पना राबवून त्या माध्यमातून विकासाचा वेग वाढविण्याची प्रस्ताव पुढे आला असून त्याचा अभ्यास सुरू आहे.

- समीर देशपांडेकोल्हापूर -  स्वत:च्या खात्याची जबाबदारी सांभाळून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक मर्यादा येतात. तातडीने निर्णय होत नाहीत, मंजूर निधी खर्च करण्यासाठी पाठपुरावा करता येत असल्याने होत नाही; म्हणून ‘पालक आमदार’ संकल्पना राबवून त्या माध्यमातून विकासाचा वेग वाढविण्याची प्रस्ताव पुढे आला असून त्याचा अभ्यास सुरू आहे. प्रस्तावाला मूर्त स्वरूप आल्यास ‘पालकमंत्री’ पद गोठण्याची शक्यता आहे. तीन किंवा चार महिन्यांतून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक सभा होते. विविध प्रकल्प, योजना, निधी यांचे वर्गीकरण, वितरण केले जाते. मात्र बैठकीनंतर केवळ अधिकाऱ्यांच्या पातळीवर कामांचा पाठपुरावा सुरू असतो. परिणामी विकासकामांचा वेग मंदावतो. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी आमदारांच्या अध्यक्षतेखाली असणाºया छोट्या गटाची बैठक होते. मात्र त्यांना फारसे अधिकार नसतात.नवे सत्ताकेंद्रजिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागते. त्यामुळे पालक आमदार हा प्रस्ताव सहजासहजी मान्य होणारा नाही. पालकमंत्र्यांचे अधिकार ‘पालक आमदार’ यांना देऊन जिल्ह्यात दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होऊ शकते.चंद्रकांत पाटील यांच्यावर अभ्यासाची जबाबदारीप्रस्तावाबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविली आहे. सर्वांशी चर्चा करून त्याबाबतचे म्हणणे पाटील हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार