शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

‘विटी दांडू’साठी ‘आयकॉन्स’चीच प्रेरणा

By admin | Updated: November 24, 2014 00:24 IST

चित्रपट कथालेखक-अभिनेते विकास कदम यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : आपण ज्या समाजात वावरलो, लहानाचे मोठे झालो, बालपणी आपल्यावर ज्या समाजातील माणसांचे संस्कार झाले, त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहे. त्याची परतफेड करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचे कार्य ‘लोकमत’चे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ हे पुस्तक करतेय. काहीशा अशाच प्रेरणेतून ‘विटी दांडू’ चित्रपटाची निर्मिती झाली आहे, असे मत ‘विटी दांडू’ चित्रपटाचे कथालेखक-अभिनेते विकास कदम यांनी व्यक्त केले.‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांच्याबरोबर कदम आले होते. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले, वास्तविक पाहता ‘विटी दांडू’ हा बालपणातील खेळ. आपण मोठे होत असताना त्याचा विसर पडतो; पण छोट्या-छोट्या गोष्टीतच सुख-समाधान लपलेले असते. हेच प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘विटी-दांडू’तून केला आहे.गावातील विविध प्रकारच्या लोकांमध्ये असलेली नाती, त्या नात्यांमधील ऋणानुबंध, गावातील छोटे-मोठे हेवेदावे, त्यातून उत्पन्न होणारे कटू-गोड प्रसंग दाखवत असतानाच एखाद्या संकटप्रश्नी सर्व विसरून एकत्रित येणारे व एकजुटीने लढा देणारे गाव दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचबरोबरीने पोवाडा, भारूड, लावणी, क्रांती गीत अशी विविधांगी सहा गाणीसुद्धा या चित्रपटात आहेत, असेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विकास कदम हा सुद्धा ‘आयकॉन’ : अजय देवगणविकास कदम यांचा जीवन प्रवास तसा खडतरच. कुंडलवाडी (ता. वाळवा) हे वडिलोपार्जित गाव. वडील आणि आजोबा दोघेही मुंबईतील गिरणी कामगार. पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण परेल-मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयापासून नाटक-चित्रपटांचे वेड असलेल्या विकास यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘आॅल दि बेस्ट’ या गुजराथी नाटकापासून केली. साधारणत: १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी-हिंदी चित्रपट आणि काही दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ‘विटी दांडू’ या पहिल्याच कथेला त्यांना प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा निर्माता मिळाला आहे, ही त्यांच्या यशस्वीतेची पावती आहे.