शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

‘विटी दांडू’साठी ‘आयकॉन्स’चीच प्रेरणा

By admin | Updated: November 24, 2014 00:24 IST

चित्रपट कथालेखक-अभिनेते विकास कदम यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : आपण ज्या समाजात वावरलो, लहानाचे मोठे झालो, बालपणी आपल्यावर ज्या समाजातील माणसांचे संस्कार झाले, त्या समाजाचे ऋण आपल्यावर आहे. त्याची परतफेड करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचे कार्य ‘लोकमत’चे ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ हे पुस्तक करतेय. काहीशा अशाच प्रेरणेतून ‘विटी दांडू’ चित्रपटाची निर्मिती झाली आहे, असे मत ‘विटी दांडू’ चित्रपटाचे कथालेखक-अभिनेते विकास कदम यांनी व्यक्त केले.‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांच्याबरोबर कदम आले होते. त्यावेळी बोलताना कदम म्हणाले, वास्तविक पाहता ‘विटी दांडू’ हा बालपणातील खेळ. आपण मोठे होत असताना त्याचा विसर पडतो; पण छोट्या-छोट्या गोष्टीतच सुख-समाधान लपलेले असते. हेच प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न ‘विटी-दांडू’तून केला आहे.गावातील विविध प्रकारच्या लोकांमध्ये असलेली नाती, त्या नात्यांमधील ऋणानुबंध, गावातील छोटे-मोठे हेवेदावे, त्यातून उत्पन्न होणारे कटू-गोड प्रसंग दाखवत असतानाच एखाद्या संकटप्रश्नी सर्व विसरून एकत्रित येणारे व एकजुटीने लढा देणारे गाव दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचबरोबरीने पोवाडा, भारूड, लावणी, क्रांती गीत अशी विविधांगी सहा गाणीसुद्धा या चित्रपटात आहेत, असेही कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विकास कदम हा सुद्धा ‘आयकॉन’ : अजय देवगणविकास कदम यांचा जीवन प्रवास तसा खडतरच. कुंडलवाडी (ता. वाळवा) हे वडिलोपार्जित गाव. वडील आणि आजोबा दोघेही मुंबईतील गिरणी कामगार. पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण परेल-मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात झाले. महाविद्यालयापासून नाटक-चित्रपटांचे वेड असलेल्या विकास यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘आॅल दि बेस्ट’ या गुजराथी नाटकापासून केली. साधारणत: १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी-हिंदी चित्रपट आणि काही दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ‘विटी दांडू’ या पहिल्याच कथेला त्यांना प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा निर्माता मिळाला आहे, ही त्यांच्या यशस्वीतेची पावती आहे.