शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

कार्यक्रमपत्रिकेत बदल केल्याची चौकशी होणार

By admin | Updated: November 15, 2014 02:36 IST

देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विरोधीपक्षनेतेपदाच्या निवडीचा विषय आधी कसा घेतला याची आता चौकशी होणार आहे.

अतुल कुलकर्णी  -मुंबई
देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विरोधीपक्षनेतेपदाच्या निवडीचा विषय आधी कसा घेतला याची आता चौकशी होणार आहे. यात विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांची चौकशी होऊ शकते का, याचीही कायदेशीर बाजू तपासून पाहिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
मिळालेली माहिती धक्कादायक आहे. पूर्वनियोजित धोरणानुसार विरोधीपक्षनेत्याची निवड हा विषय नागपूर अधिवेशनात घेण्याचे ठरले होते. तोर्पयत शिवसेनेची भूमिकादेखील स्पष्ट होईल आणि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर शिवसेना मतदान करेल, अशी खेळी भाजपाने आखली होती. पण सेना नेते रामदास कदम यांनी विरोधात बसण्याची घोषणा करताच भाजपाने तत्काळ पुन्हा बोलणी चालू केली. उद्धव ठाकरेंचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकरदेखील विधान भवनात आले व बोलणी सुरू झाली. 
शिवसेनेच्या काही नेत्यांना याची कुणकुण लागली आणि कार्यक्रमपत्रिकेत विरोधीपक्षनेत्यांच्या निवडीचा विषय विश्वासदर्शक ठरावाच्या आधी आणण्यासाठी प्रधान सचिव कळसे यांच्यावर दबाव आणला गेला. त्याआधी संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विश्वासदर्शक ठराव आधी घेतला जाईल, अशी कार्यक्रमपत्रिका मंजूर केली 
होती.
मात्र बदललेली कार्यक्रमपत्रिका पाहताच ते संतापले व त्यांनी कळसे यांच्याकडे याबाबत विचारणा केल्याचे सूत्रंनी सांगितले. कळसे यांनी हंगामी अध्यक्षांनी तसे करायला सांगितल्याचा खुलासा करताच मेहतांनी हंगामी अध्यक्षांना फोन करून विचारणा केली तेव्हा त्यांनादेखील काय घडले, याची कल्पना नव्हती. म्हणून ‘कोणता बदल?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला. हा सगळा प्रकार कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील संतापले; पण तोर्पयत कार्यक्रमपत्रिकेचे वाटप झाले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड होताच त्यांच्या अधिकारात विषयांचा क्रम बदलावा, असे ठरले.
त्यानुसार नव्या अध्यक्षांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर होताच, विश्वासदर्शक ठराव आधी घेतला जाईल आणि विरोधीपक्षनेत्यांची निवड नंतर केली जाईल, असे घोषित केले. त्यावर शिवसेना गदारोळ करेल हे लक्षात घेऊनच ‘होय’चे बहुमत, ‘होय’चे बहुमत, विश्वासदर्शक ठराव मंजूर’ असा लेखी प्रस्ताव तयार ठेवला गेला. जो अध्यक्षांनी नंतर वाचून दाखवला.
या सगळ्या नाटय़ावर राष्ट्रवादीचे गटनेते आर.आर. पाटील म्हणाले, ही तर शिवसेना आणि भाजपाची मिलीभगत होती. त्यांनी ठरवून हे केले. मात्र भाजपाने आवाजी मतदानाने ठराव मंजूर करण्याचे ठरवले होते. कारण त्यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा नको होता. 
ठराव मंजूर करायचा आणि विरोधीपक्षनेतेपदाचा निर्णय नागपुरात घ्यायचा, तोर्पयत बोलणी चालू ठेवायची असा डाव भाजपाचा होता. या सगळ्यात शिवसेनेच्या एका गटाने आयत्यावेळी विरोधीपक्षनेतेपदाचा विषय कार्यक्रम पत्रिकेत आणण्यासाठी केलेला दबाव सगळेच डाव उधळून गेला. त्यामुळेच आता या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचे सरकारने ठरवले आहे. अध्यक्षांसोबत तशी बैठकही झाल्याचे समजते.
 
सचिव कार्यक्रमपत्रिका तयार करतात. मात्र त्यात बदल करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. मी अध्यक्ष होण्याच्या आधी त्यांनी कशा पद्धतीने पत्रिका केली हे मला माहीत नाही. मात्र सरकार स्थिर झाल्यानंतर त्या सरकारचा विरोधीपक्षनेता असावा असा माझा तर्क आहे. त्यानुसार तो अध्यक्ष या नात्याने निर्णय घेतला आहे, असे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितले.