शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: June 3, 2015 05:05 IST

मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडोरसाठी (डीएमआयसी) राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे.

अलिबाग : मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडोरसाठी (डीएमआयसी) राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भूसंपादनाचे काम करण्यात येत आहे. परंतु हे भूमी संपादन करण्याकरिता शासनाचे सर्वत्र एकच धोरण असताना प्रत्यक्षात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि कोकणातील रायगडमध्ये वेगवेगळे धोरण अमलात आल्याचे दिसून येत आहे. रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा दावा या उभय ठिकाणच्या प्रत्यक्ष भूमी संपादनाच्या प्रक्रियेचा अभ्यास केलेले सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ९ गावांमधून ३ हजार ३२८ हेक्टर, पाणसई व शेजारील १० गावांतील १ हजार ७८० हेक्टर, तर वावे परिसरातील १ हजार १९८ हेक्टर अशी सुमारे २० हजार शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांना ५ मार्च २०१३ च्या शासन आदेशानुसार १५ टक्के एकरी विकसित भूखंड संपादनाच्या दराने देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार मराठवाड्यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचे वाटपदेखील झाल्याचे पाटील यांनी सांगितले.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने(एमआयडीसी) गेल्या २५ जुलै २०१४ रोजी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन करण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानुसार शेतकऱ्यांस १५ टक्के विकसित भूखंड नको असल्यास प्रति हेक्टरी ४६ लाख रु पये मोबदला देण्यात येणार होता, तर १५ टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यास पाहिजे असल्यास ३२ लाख ५० हजार रु पये मोबदला ठरला होता. भूसंपादनाच्या दराने १५ टक्के विकसित भूखंडाचा दर २ लाख ७६ हजार एवढाच घेता येतो. तोही प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्ष वाटप करताना २५ टक्के अनामत रक्कम भरावी लागते. बाकी रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्याची तरतूद आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून ५ लाख ४० हजार रु पये वसूल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याने हा शासन निर्णयाचा भंग असल्याचा दावा पाटील यांनी केला.भूसंपादन करताना शेतातील झाडे, विहीर, पाण्याच्या सुविधा, गोठा, घर यांचा वेगळा मोबदला देण्याचे शासन आदेशात निश्चित केले आहे. अशा प्रकारे मराठवाड्यातील डीएमआयसी प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात आला. मात्र कोकणामध्ये या विषयीचे संमतीपत्र घेतानाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. भूमी संपादनातील ‘प्रकल्पग्रस्त शेतकरी’ असा दाखला देण्याचेही या भूमी संपादन नीतीमध्ये नमूद आहे. मराठवाड्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे़ परंतु रायगडमधील शेतकऱ्यांना हे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात येणार नसल्याने प्रकल्पग्रस्तांना डीएमआयसीमध्ये हक्काच्या रोजगारापासून वंचित ठेवले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)