शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जखमी चिमुकलीचाही मृत्यू, काशीळ गावाजवळील अपघातातील मृतांची संख्या सात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:29 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई-वडिलांना हज यात्रेला सोडण्यासाठी जात असताना सौदागर कुटुंबावर काळाने घाला घातला. हा अपघात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देकार झाडावर आदळून एकाच कुटुंबातील सातजण ठारमृतांमध्ये तीन चिमुकल्यांचाही समावेश : हज यात्रेला जाताना काळाचा घाला

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून काशीळ गावाजवळ झालेल्या अपघातात जखमी चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या सात झाली असून हे सातहीजण एकाच कुटुंबातील आहेत. वृद्ध आई-वडिलांना हज यात्रेला सोडण्यासाठी जात असताना सौदागर कुटुंबावर काळाने घाला घातला. हा अपघात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास झाला.

मन्सुब निजामुद्दीन सौदागर निजामुद्दीन अब्दुलनबी सौदागर (वय ६९), सफुरा निजामुद्दीन सौदागर (वय ५८), मन्सुब निजामुद्दीन सौदागर (वय ४०), नाफिया मन्सुब सौदागर (वय ३५), तैयबा मन्सुब सौदागर (वय ६), आकसा मन्सुब सौदागर (वय ४ वर्षे), अहमदरजा मन्सुब सौदागर (वय २ वर्षे, सर्व रा. मदिहाळ डेअरी भंडारी गल्लीरोड, धारवाड, राज्य कर्नाटक) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात चालक शहाबाज इस्माईल भंडारी (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निजामुद्दीन सौदागर आणि सफुरा सौदागर हे दाम्पत्य हज यात्रेला जाणार होते. त्यांना सोडण्यासाठी मुलगा मन्सुब आणि सून नाफिया हे आपल्या तीन चिमुकल्यांसह मुंबईला निघाले होते. कर्नाटकातून हे सर्वजण कारने (के २५ एमसी ४३५९) कोल्हापूरमार्गे मुंबईला निघाले होते. शहाबाज भंडारी हा कार चालवत होता.

 

 

कऱ्हाडजवळ त्यांनी जेवण केल्यानंतर हे सर्वजण पुढील प्रवासाठी निघाले. सातारा तालुक्यातील काशीळ गावाजवळ आल्यानंतर चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे भरधाव असलेली कार महामार्गाकडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडावर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

कारमध्ये अडकलेल्या तैयबा सौदागर आणि चालक शहाबाज भंडारी याला कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तैयबा सौदागरचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण सौदागर कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्नाटकातील धारवाडमध्ये सौदागर कुटुंबीयांचा फूल विक्रीचा व्यवसाय होता. हज यात्रेला जाण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरbelgaonबेळगाव