शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार

By admin | Updated: September 24, 2015 02:12 IST

एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन

जमीर काझी ल्ल मुंबई एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) व असोसिएशन्स आॅफ मुस्लिम प्रोफेशनल्स (एएमपी) या संस्थांतर्फे राबविला जात आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी मौलवी स्वत: हातभार लावणार आहेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन मुंबईतील लाखो बांधवांनाही करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (२५ सप्टेंबर) साजऱ्या होणाऱ्या ईद-ऊल अज्हा (बकरी ईद) पार्श्वभूमीवर त्यासाठी देणगी गोळा केली जाणार आहे.ईदच्या नमाज पठणानंतर मुंबईतील सुमारे शंभराहून अधिक मशीदींतून दुष्काळग्रस्तासाठी मदत गोळा केली जाईल. त्याचप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून देणगीसाठी आवाहन करण्यात येत आहे. यातून जमणारा निधी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वितरीत केला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारपासून मुस्लिम समाजातील विविध घटकांमध्ये कार्यशाळा घेवून मदतीबाबत आवाहन केले जात आहे. याबाबत बोलताना ‘सेवा’चे अध्यक्ष अ‍ॅड. युसूफ अब्राहनी म्हणाले, शासकीय मदतीला मर्यादा असल्याने माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे ४ हजारावर सक्रिय सभासद आहेत. प्रत्येक जण ५ हजारांपासून लाखापर्यंत शक्य तितकी रक्कम जमा करणार आहेत. देणगीची संबंधितांना रितसर पावती दिली जाईल. जमियत-उलेमाचे अध्यक्ष मौलवी मुस्तिकीम आझमी म्हणाले,‘समाजातील दीन, दलित व गरजूंना मदत करण्याचे आदेश पवित्र ग्रंथ कुराण व प्रेषित महंमद पैगंबर यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्यांना धर्म, जातभेद विसरुन अर्थसहाय्य उभे केले जाईल. ईदच्या नमाजपठणानंतर त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना (दुवा) करण्याबरोबरच मशिदीतून मदत गोळा केली जाणार आहे. ‘एपीपी’चे अध्यक्ष अमीर इद्रसी म्हणाले, ‘संस्थेचे राज्यात २ हजारांवर सभासद आहेत. ते स्वत:च्या खिशातून मदत देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळवित आहेत. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडूनही गरजूंबाबत माहिती मिळविली जात आहे.