शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
3
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
4
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
6
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
7
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
8
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
9
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
10
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
11
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
12
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
13
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
14
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
15
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
16
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
17
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
18
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
19
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
20
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मार्चच्या सुरुवातीलाच डिंभे धरण झाले अर्धे रिकामे

By admin | Updated: March 4, 2017 00:59 IST

धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

डिंभे : धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. १३.५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाणीसाठा यंदा मार्चच्या सुरुवातीलाच निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ७३० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, घोड नदीपात्र व दोन्ही कालवे सुरू आसल्याने डिंभे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. धरणात सध्या ४९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.उन्हाळ्याचे दिवस व शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने पाणी न वापरल्यास यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणातच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. कुकडी प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचे धरण समजल्या जाणाऱ्या या धरणात आजमितीस ४९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून अनुक्रमे ५५० व १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, सुरू असणाऱ्या आवर्तनामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.मागील वर्षी या तारखेला धरणात २६.५८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदाचा साठा जास्त वाटत असला, तरी परतीच्या पावसाने वेळेआधीच आखडता हात घेतलेल्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो.जानेवारी-फेबु्रवारीदरम्यान या धरणातून आवर्तन सुरू होते. या आवर्तनामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. उन्हाची तीव्रता वाढल्याने या धरणातून तातडीने पाणी सोडण्याविषयी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे सध्या या धरणाचे दोन्ही कालवे सुरू असून सुमारे ७३० क्युसेक्सने धरणातून पाणी बाहेर पडत आहे. आजमितीस धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीकडे लक्ष देता शिल्लक आसणारे पाणी व उन्हाळ्याचा मार्च, एप्रिल, मे व जून महिने बाकी आसताना धरणातील शिल्लक पाणीसाठा ही चिंतेची बाब झाली आहे. अख्खा उन्हाळा बाकी आसताना धरणातील पाण्याची होत असलेली घट यामुळे पुढी तीन ते चार महिने शिल्लक पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.धरणाच्या पाण्यावर पोखरी, बोरघर या आदिवासी गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. जर याच गतीने पाण्याचा विसर्ग सुरू राहिला, तर आदिवासी गावांच्या पाणी योजना धोक्यात येऊन पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांनाही यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (वार्ताहर)