शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

मार्चच्या सुरुवातीलाच डिंभे धरण झाले अर्धे रिकामे

By admin | Updated: March 4, 2017 00:59 IST

धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

डिंभे : धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. १३.५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाणीसाठा यंदा मार्चच्या सुरुवातीलाच निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ७३० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, घोड नदीपात्र व दोन्ही कालवे सुरू आसल्याने डिंभे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. धरणात सध्या ४९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.उन्हाळ्याचे दिवस व शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने पाणी न वापरल्यास यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणातच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. कुकडी प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचे धरण समजल्या जाणाऱ्या या धरणात आजमितीस ४९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून अनुक्रमे ५५० व १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, सुरू असणाऱ्या आवर्तनामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.मागील वर्षी या तारखेला धरणात २६.५८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदाचा साठा जास्त वाटत असला, तरी परतीच्या पावसाने वेळेआधीच आखडता हात घेतलेल्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो.जानेवारी-फेबु्रवारीदरम्यान या धरणातून आवर्तन सुरू होते. या आवर्तनामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. उन्हाची तीव्रता वाढल्याने या धरणातून तातडीने पाणी सोडण्याविषयी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे सध्या या धरणाचे दोन्ही कालवे सुरू असून सुमारे ७३० क्युसेक्सने धरणातून पाणी बाहेर पडत आहे. आजमितीस धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीकडे लक्ष देता शिल्लक आसणारे पाणी व उन्हाळ्याचा मार्च, एप्रिल, मे व जून महिने बाकी आसताना धरणातील शिल्लक पाणीसाठा ही चिंतेची बाब झाली आहे. अख्खा उन्हाळा बाकी आसताना धरणातील पाण्याची होत असलेली घट यामुळे पुढी तीन ते चार महिने शिल्लक पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.धरणाच्या पाण्यावर पोखरी, बोरघर या आदिवासी गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. जर याच गतीने पाण्याचा विसर्ग सुरू राहिला, तर आदिवासी गावांच्या पाणी योजना धोक्यात येऊन पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांनाही यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (वार्ताहर)