शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

मार्चच्या सुरुवातीलाच डिंभे धरण झाले अर्धे रिकामे

By admin | Updated: March 4, 2017 00:59 IST

धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

डिंभे : धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात ६.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. १३.५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाणीसाठा यंदा मार्चच्या सुरुवातीलाच निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ७३० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, घोड नदीपात्र व दोन्ही कालवे सुरू आसल्याने डिंभे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. धरणात सध्या ४९ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.उन्हाळ्याचे दिवस व शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने पाणी न वापरल्यास यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणातच्या पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. कुकडी प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचे धरण समजल्या जाणाऱ्या या धरणात आजमितीस ४९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून अनुक्रमे ५५० व १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, सुरू असणाऱ्या आवर्तनामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे.मागील वर्षी या तारखेला धरणात २६.५८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदाचा साठा जास्त वाटत असला, तरी परतीच्या पावसाने वेळेआधीच आखडता हात घेतलेल्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर या तालुक्यांतील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो.जानेवारी-फेबु्रवारीदरम्यान या धरणातून आवर्तन सुरू होते. या आवर्तनामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. उन्हाची तीव्रता वाढल्याने या धरणातून तातडीने पाणी सोडण्याविषयी वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे सध्या या धरणाचे दोन्ही कालवे सुरू असून सुमारे ७३० क्युसेक्सने धरणातून पाणी बाहेर पडत आहे. आजमितीस धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीकडे लक्ष देता शिल्लक आसणारे पाणी व उन्हाळ्याचा मार्च, एप्रिल, मे व जून महिने बाकी आसताना धरणातील शिल्लक पाणीसाठा ही चिंतेची बाब झाली आहे. अख्खा उन्हाळा बाकी आसताना धरणातील पाण्याची होत असलेली घट यामुळे पुढी तीन ते चार महिने शिल्लक पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.धरणाच्या पाण्यावर पोखरी, बोरघर या आदिवासी गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. जर याच गतीने पाण्याचा विसर्ग सुरू राहिला, तर आदिवासी गावांच्या पाणी योजना धोक्यात येऊन पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांनाही यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (वार्ताहर)