शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

महागाई, बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे; शिवसेना मंत्री दादा भुसेंचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:49 IST

आज कोणीही बोलत असलं तरी शिवसेना कोणीही संपवू शकत नाही असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे, ४ मे रोजी जर भोंगे उतरले नसतील तर मशिदीबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा दुप्पट लाऊडस्पीकरवर लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मनसे घेत असल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

दादा भुसे म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. स्थानिक प्रशासन याबाबत चौकशी करून परवानगी देईल. मात्र, वैयक्तिक विचाराल तर इतरही अनेक महत्वाचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आता महत्वाचे आहे.आज कोणीही बोलत असलं तरी शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. ५०-६० वर्ष रक्ताचं पाणी करून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केलीय. आज ते जरी मोठे नेते असले तरी बाळासाहेबांचाच आशीर्वाद आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच मंदिर मशिदीचा मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचं पालन करावे लागेल. मालेगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. काही गावांचा इतिहास आहे पण मालेगावने चांगलं वागून नाव लौकिक केलय. पण काही लोकांनी ठरवलंच आहे तर त्याला काही करू शकत नाही असं सांगत दादा भुसे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंचाही राज ठाकरेंना टोला

आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी नाही म्हटले तरी थोडासा धुर्तपणे भाजपसोबत वागतो, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं तसेच भोंग्याचा मुद्दा गाजलाय असे मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे, तो निर्णय देशभर लागू आहे. गतआठवड्यात गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात एक बैठकही घेतली. त्यामध्ये असेच ठरले की, जसे नोटबंदी केली, लॉकडाऊन केले, हा निर्णय देशभर लागू केला होता. त्याचप्रमाणे भोंगाबंदीही देशभर करा असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भोंग्याचा चेंडू केंद्राकडे ढकलला. त्याचसोबत अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणकोणते खेळ करताता हे लोकांनी अनुभवलं आहे.कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ तर असे खेळाडू असतात ना असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सारे काही बंद होते. आता कुठे जनजीवन रुळावर येत आहे, अशा परिस्थितीत फुकटात करमणूक पाहायची असेल तर ती का नाही पाहायची असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना