शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

By admin | Updated: June 8, 2017 03:23 IST

जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला असून बुधवारी आठवडे बाजारात वटसावित्रीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. उपवासाचा हा दिवस मोठ्या श्रद्धेचा मानला जातो. आधुनिक काळातही त्याचा महिमा तसूभरही कमी झालेला नाही. या व्रतासाठी विक्रमगडमधील नवविवाहीता तीन दिवस उपवास करुन चौथ्या दिवशी विधीवत पूजा करतात. त्या वेळेस पूजेसाठी लागणाऱ्या करंडाफणी, आंब्यांचे वाण, हळद-कुंकू, हिरव्या बांगडया, खारीक, बदाम, सुपारी, फणस यांचे दर वाढलेले आहेत. वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाइची झळ बसली असून त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहेत. आंबा एक नग ५ ते १० रुपये, करडांफणी ८ ते १० रुपये, हिरव्या बांगडया २५ ते ३० रुपये डझन, फणस गरा ४ ते ५ रुपये, खरीक एक नग ४ ते ५ रुपये, बदाम एक नग ४ ते ५ रुपये, हळद-कुंकू १५ ते २० रुपये, सुपारी एक नग ५ ते १० रुपये अशी वाढ झाली आहे.>‘जुन्या परंपरा मोडल्या जात आहेत’पूर्वी गावात एक ते दोनच ठिकाणी वडाखाली पूजा केली जात असे. परंतु, आता ही परंपरा लोप पावत चालेली असून ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात वडाच्या फांद्या देवळात आणून अनेक ठिकाणी पुजा मांडल्या जातात. महिला आपल्या सवडीनुसार येऊन पूजा करतात़ पूर्वी असे नव्हते आता आधुनिक युगाबरोबर परंपराही मोडल्या जात आहेत़, अशी खंत विक्रमगड येथील ज्येष्ठ महिला कमल औसरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.वटपूजन दुपारी साडेबारापर्यंतच : दाते पंचागवटपौर्णिमा गुरुवारी ८ जून रोजी दुपारी ४़ ३० नंतर शुक्रवारपर्यत आहे़ पण चतुर्दशी ही गुरुवारी आहे़ आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते़ म्हणून पूजन हे गुरुवारी सूर्योदयापसून ते मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु़ १२.३० पर्यतच करणे बंधकारक आहे. तरी सर्व महिलांनी दु. १२़ ३० पर्यतच पूजन करावे नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ७़ ते ८ व ११ ते १२़ ३० पर्यत पूजन करावे असे दाते पंचांगमध्ये म्हंटले आहे़ वटासावित्रीचे व्रत अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ त्यासाठी पौर्णिमेच्या आदल्या दोन दिवस व पौर्णिमा झाल्यावर चंद्रोदय होईपर्यत असे एकूण चार दिवस उपवास करतात. - भुरी धवल पटेल,अजूनही जुनी परंपरा विक्रमगड व ग्रामीण भागात महिलांनी जोपसली असून आधुनिक काळातही नवविवाहीत सौभाग्यवती आपल्या पतीसाठी चार दिवस उपवास करते व हे व्रत पूर्ण करते़- रजनी अरुण मनारे , विक्रमगड