शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बालमृत्यूंचे मूळ मातांच्या कुपोषणात!, बाळांची वाढही अपुरीच

By अतुल कुलकर्णी | Updated: October 5, 2017 05:44 IST

नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही...

मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही, परिणामी त्यांचे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) १९ पेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष नाशिकच्या आयुक्तांनी मुख्य सचिव व महिला बाल कल्याण तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहेत. अहवाल मंत्रालयात आल्यानंतरही सगळ्यांनीच मौन बाळगले आहे.मरण पावलेल्या काही अर्भकांच्या मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता. एका मातेचे वजन केवळ ३५ ते ३६ किलो होते. म्हणजे माताच कुपोषित होत्या. त्यामुळे बाळाची वाढ कमी होऊन त्यांचेही वजन कमी राहिले किंवा मुदतपूर्व प्रसुती झाल्या. महिला व बाल कल्याण विभागाचा रोख पुरवठा व रेकॉर्ड नीट ठेवण्याकडे होता. त्याचे पुढे काय झाले याकडे दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. ज्या गरोदर मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता, तो वाढण्यासाठी विशेष तयारी केली का? याचे उत्तर नकारात्मक आल्याचेही हा अहवाल सांगतो. गरोदर मातेच्या बीएमआयसाठी आणि अर्भकाच्या वाढीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर तसेच अंगणवाडी स्तरावर आढावा आवश्यक आहे.कठोर कारवाईची आवश्यकतासरकारच्या योजना चांगल्या आहेत, पण त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळपणे झाले आहे. योजना प्रभावीपणे राबवायची असेल तर वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांपासून ते अंगणवाडी सेविका, आशा वर्करपर्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत कोणावरही ना आक्षेप घेतले गेले ना कारवाई केली गेली.कमी वयाची मुले जन्माला आल्यास त्यांना इनक्युबिटरमध्ये ठेवले जाते, मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इनक्युबिटरमध्ये दोन वा तीन मुले ठेवल्याचे समोर आल्याचेही ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.आयुक्त महेश झगडे यांनी समिती नेमली होती. त्या समितीने हे सारे नमूद केले आहे. महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने गरोदर मातांना सोयीसुविधा पुरविल्याचे दाखवले आहे. पण त्या दिल्या नसल्याचा संशय अहवालात आहे.