शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

इंदू मिल राज्याच्या ताब्यात!

By admin | Updated: April 6, 2015 04:33 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील (दादर) इंदू मिलची १२ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधीच्या

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुंबईतील (दादर) इंदू मिलची १२ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधीच्या एका त्रिपक्षीय करारावर रविवारी स्वाक्षरी करण्यात आल्याने स्मारकाच्या उभारणीच्या दिशेने पुढील पाऊल पडले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदेश दौऱ्यामुळे येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा मुहूर्त टळणार आहे.डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरिता वेगवेगळे मुहूर्त जाहीर झाले होते. येत्या १४ एप्रिल रोजी भूमिपूजन होणार, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. परंतु पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना युरोपच्या दौऱ्यावर जायचे असल्याने १४ एप्रिलचा मुहूर्त टळल्याचे  स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम तसेच रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी आपण त्याच दिवशी भूमिपूजन करू, असे जाहीर केले होते. औरंगाबाद, नवी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना सरकार डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत टाळाटाळ करीत असल्याची टीका सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीवरून पंतप्रधान मोदी यांनी जमीन हस्तांतरणाचा त्रिपक्षीय करार करून या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम दिला.केंद्र सरकारच्या मान्यतेने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी इंदू मिलची जमीन डॉ. आंबेडकर स्मारकाकरिता देण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला होता. मात्र याकरिता संसदेत कायदा करावा लागेल, अशी भूमिका त्या वेळी घेतली गेली होती. या जागेच्या किमतीऐवजी टीडीआर देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. राज्य शासनाने याबाबत महाधिवक्त्यांचे मत घेतले होते. संसदेत कायदा करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने एनटीसी ही जागा राज्य सरकारला देऊ शकते, असा अभिप्राय दिला. दी टेक्सटाईल अंडरटेकिंग नॅशनलायझेशन अ‍ॅक्ट १९९५ च्या कलम ११ अन्वये केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेऊन एनटीसी ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करू शकते. ही राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारने स्वीकारली. त्यानुसार पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस व वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत याबाबतच्या त्रिपक्षीय करारावर एनटीसीचे अध्यक्ष व प्रबंध संचालक पी. सी. वैश व महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त यांनी स्वाक्षऱ्या केल्या. जमिनीचा मोबदला ठरविण्याकरिता व हस्तांतरण सुरळीत होण्याकरिता केंद्र सरकारच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)