शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निष्काम सेवा देणारे इंद्रायणीचे स्वच्छतादूत

By admin | Updated: April 3, 2017 02:04 IST

नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत.

राजेंद्र काळोखे,देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्र कायमच स्वच्छ ठेवण्याचा व नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत. इंद्रायणीमातेची सेवा करण्याचे काम करण्याचे काम स्वच्छतादूत पाच जण करीत आहेत.तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस आॅफ नेचर संस्थेने इंद्रायणीत जाणीवपूर्वक वाढविलेले महाशीर जातीचे मासे हे देहूचे वैभव आहे. ते जोपासण्याचे कामही करीत हे स्वच्छतादूत करीत आहेत. त्यांच्या कामाची चिकाटी पाहून येथील काही सामाजिक संस्थाही या कामात आपापल्या सोयीनुसार सहभागी होत असून, मदतीचा हातही पुढे करीत आहेत. हे स्वच्छतादूत लोकहितासाठी व नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि महाशीर माशांच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. हे स्वच्छता वेडे पाच जण आहेत सोमनाथ मुसुडगे, निवृत्तीमहाराज मोरे, रावसाहेब काळोखे, नाना वाघमारे व भीमराव भिंगारदिवे. या कामाची प्रेरणी श्री संत तुकाराम महाराज व स्वच्छतेचे पुरस्कर्ते गाडगेबाबा यांच्याकडून मिळाल्याचे ते सांगतात.ते भल्या पहाटे आपले घरची कामे उरकून देवदर्शन करून श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील घाटावर जमतात. येथूनच आपल्या दिवसाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करतात. येथून वैकुंठगमण मंदिरापर्यंतचा सुमारे दोनशे मीटरचा घाट साफ करतात. यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांकडील दाताळे या अवजाराचा वापर करून या वस्तू बाहेर काढल्या जातात. घाटावर लावण्यात आलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकल्या जातात.>इंद्रायणी उगमस्थान स्वच्छतेचा संकल्पभविष्यात इंद्रायणी नदीचा उगमस्थान असलेले कुरवंडे गाव, नागफणी, खंडाळा येथे गोमुख बांधून येथील नदीच्या स्वच्छतेला सुरवात करणाचा व तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असलेल्या संगमस्थळापर्यंत इंद्रायणीला प्रदूषणमुक्त व स्वच्छ करण्याचा मनोदय असल्याचे सोमनाथ मुसुडगे यांनी सांगितले.देहूला वर्षातून तीन मोठ्या यात्रा भरतात. या वेळी व शेतीसाठी पाणी कमी पडल्यास पाटबंधारे विभागाच्या वतीने आंद्रा व वडीवळे धरणातून वेळोवेळी पाणी सोडले जाते. या पाण्याबरोबरच वाहून येणारी जलपर्णी वेळोवेळी बाहेर काढून नष्ट केली जाते. हे जोखमीचे काम मदतीशिवाय करणे अवघड असतानाही ही मंडळी आपल्या परिने करीत असतात. हे काम करण्यासाठी त्यांना आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. काही दानशूर व्यक्ती किंवा संस्था यांच्या मदतीने हे साहित्य मिळविले जाते. पालकमंत्री गिरीश बापट हे त्यांच्या बहिणीच्या अस्थी विसर्जन करण्याच्या निमित्ताने गावात आले असता त्यांनी या स्वच्छतादूत पाच जणांची कामाची दखल घेऊन दोन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी दिले होते. स्वच्छतादूतांना येथील गजराज बोट क्लबचे संचालक गजानन काळोखे व त्यांचे कर्मचारी सोमनाथ पेठेकर, बारक्या पवार हे नेहमीच सहकार्य करतात. काढलेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाहून नेतात. देहूकर नागरिकही या कामात मदत देत आहेत, असेही स्वच्छतादृतांनी सांगितले.