शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

निष्काम सेवा देणारे इंद्रायणीचे स्वच्छतादूत

By admin | Updated: April 3, 2017 02:04 IST

नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत.

राजेंद्र काळोखे,देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्र कायमच स्वच्छ ठेवण्याचा व नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत. इंद्रायणीमातेची सेवा करण्याचे काम करण्याचे काम स्वच्छतादूत पाच जण करीत आहेत.तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस आॅफ नेचर संस्थेने इंद्रायणीत जाणीवपूर्वक वाढविलेले महाशीर जातीचे मासे हे देहूचे वैभव आहे. ते जोपासण्याचे कामही करीत हे स्वच्छतादूत करीत आहेत. त्यांच्या कामाची चिकाटी पाहून येथील काही सामाजिक संस्थाही या कामात आपापल्या सोयीनुसार सहभागी होत असून, मदतीचा हातही पुढे करीत आहेत. हे स्वच्छतादूत लोकहितासाठी व नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि महाशीर माशांच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. हे स्वच्छता वेडे पाच जण आहेत सोमनाथ मुसुडगे, निवृत्तीमहाराज मोरे, रावसाहेब काळोखे, नाना वाघमारे व भीमराव भिंगारदिवे. या कामाची प्रेरणी श्री संत तुकाराम महाराज व स्वच्छतेचे पुरस्कर्ते गाडगेबाबा यांच्याकडून मिळाल्याचे ते सांगतात.ते भल्या पहाटे आपले घरची कामे उरकून देवदर्शन करून श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील घाटावर जमतात. येथूनच आपल्या दिवसाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करतात. येथून वैकुंठगमण मंदिरापर्यंतचा सुमारे दोनशे मीटरचा घाट साफ करतात. यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांकडील दाताळे या अवजाराचा वापर करून या वस्तू बाहेर काढल्या जातात. घाटावर लावण्यात आलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकल्या जातात.>इंद्रायणी उगमस्थान स्वच्छतेचा संकल्पभविष्यात इंद्रायणी नदीचा उगमस्थान असलेले कुरवंडे गाव, नागफणी, खंडाळा येथे गोमुख बांधून येथील नदीच्या स्वच्छतेला सुरवात करणाचा व तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असलेल्या संगमस्थळापर्यंत इंद्रायणीला प्रदूषणमुक्त व स्वच्छ करण्याचा मनोदय असल्याचे सोमनाथ मुसुडगे यांनी सांगितले.देहूला वर्षातून तीन मोठ्या यात्रा भरतात. या वेळी व शेतीसाठी पाणी कमी पडल्यास पाटबंधारे विभागाच्या वतीने आंद्रा व वडीवळे धरणातून वेळोवेळी पाणी सोडले जाते. या पाण्याबरोबरच वाहून येणारी जलपर्णी वेळोवेळी बाहेर काढून नष्ट केली जाते. हे जोखमीचे काम मदतीशिवाय करणे अवघड असतानाही ही मंडळी आपल्या परिने करीत असतात. हे काम करण्यासाठी त्यांना आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. काही दानशूर व्यक्ती किंवा संस्था यांच्या मदतीने हे साहित्य मिळविले जाते. पालकमंत्री गिरीश बापट हे त्यांच्या बहिणीच्या अस्थी विसर्जन करण्याच्या निमित्ताने गावात आले असता त्यांनी या स्वच्छतादूत पाच जणांची कामाची दखल घेऊन दोन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी दिले होते. स्वच्छतादूतांना येथील गजराज बोट क्लबचे संचालक गजानन काळोखे व त्यांचे कर्मचारी सोमनाथ पेठेकर, बारक्या पवार हे नेहमीच सहकार्य करतात. काढलेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाहून नेतात. देहूकर नागरिकही या कामात मदत देत आहेत, असेही स्वच्छतादृतांनी सांगितले.