शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इंदिराजींमुळेच देश सुरक्षेत स्वयंपूर्ण - प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:17 IST

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले.

सोलापूर : भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले. यामुळेच आज चीन आणि पाक एकत्र आल्यानंतरही गप्प राहिले आहेत. याचे श्रेय इंदिराजींच्या अण्वस्त्रसिद्धतेच्या धोरणाला असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन केले होते. त्यात प्रतिभाताई बोलत होत्या. इंदिरा गांधींच्या रुपाने एक कणखर नेतृत्व देशाला मिळाले. पूर्वी अमेरिकेतून धान्य मागवले जायचे. अन्न धान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे या एकाच भूमिकेतून त्यांनी एकसूत्री कार्यक्रम राबवला. त्यांच्या व्यापक दृष्टीकोनामुळेच आपला देश आज स्वयंपूर्ण आहे, किंबहुना आज भारत एक पाऊल पुढे आहे. देशातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी राष्टÑीयकृत बँकांची निर्मिती केली. देशाला सुरक्षित करण्यासाठी मोठे कार्य केले. पंडित नेहरुंनी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करुन देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. मोहन प्रकाश यांनी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या राजकारणावर चौफेर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंदिराजींनी देशाला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांनी केले.एकीकडे राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावलेली असताना नारायण राणे यांची अनुपस्थिती जाणवत होती. राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. शिवाय, रविवारी भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत होते. त्यांच्या मुंबई दौ-यात राणे हे शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.