शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:39 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नसल्याने त्यांना नवीन पक्ष काढावा लागला आहे. मात्र आता त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत ब-याच घडामोडी घडतील, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. आमच्या पक्षप्रमुखांवर राणेंनी टीका केली तर ती सहन करणार नाही, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडी येथे बोलत होते.यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश परब, अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, बाळू माळकर आदी उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने स्वीकारले नाही. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे राणेंची पार्श्वभूमी पाहून तो त्यांना स्वीकारणार नव्हते. आता नवीन पक्ष काढला आहे. मात्र नवीन पक्षाला एनडीएमध्ये घेत असताना त्यांची व त्यांच्यासोबत असलेल्यांची पार्श्वभूमी तपासावी. अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मग हे नेते भाजपाला चालतील का? याचाही विचार करावा. जेव्हा आपण भ्रष्टाचारमुक्त भारत असा नारा देतो तेव्हा भ्रष्टाचार करणा-या व ज्यांच्या चौकशी सुरू आहेत अशांना पक्षात घेणार का? हेही बघितले पाहिजे.काम कमी, जाहिरात जास्तराणे हे मंत्री असताना सिंधुदुर्गचा विकास झाला नाही, त्यापेक्षा अधिक विकास आमच्या काळात झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आणला आहे. विकास प्रगतिपथावर आहे. उलट राणे यांनी मुख्यमंत्री असताना काय काम केले ते त्यांनी जाहीर करावे. राणे हे काम करतात कमी आणि जाहिरात जास्त करतात, अशी टीकाही यावेळी मंत्री केसरकर यांनी केली. राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढला तो चालवावा, पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये. अन्यथा आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.दहशतीने ग्रामपंचायती आपल्याकडे घेण्याचा प्रयत्नसावंतवाडी तालुक्यात आम्ही एकाच ग्रामपंचायतीत अर्ज सादर केले नाहीत, तर काही ठिकाणी गाव पॅनेल असल्याने त्यांना समर्थन दिले. पण आता काहींनी दहशतीच्या जोरावर गाव पॅनेल असलेल्या ग्रामपंचायती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. गाव पॅनेल निवडून आले त्यातील अनेकांनी मला फोन करून आमचे गाव पॅनेल असून, तुमच्याकडे विकासकामासाठी केव्हाही येऊ शकतो, असे सांगितले आहे. मी सर्वांना विकासासाठी मदत करणार आहे. असे सांगत गाव पातळीवरच्या राजकारणात मी कुठेही हस्तक्षेप करणार नसल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर