शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 03:42 IST

देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

मुंबई : बल, बुद्धी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरू कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.भारत जैन महामंडळाने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ‘विश्व मैत्री दिवस : क्षमापन’ समारोहात ते बोलत होते. या वेळी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम.के. जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.के. तातेड, बँक आॅफ बडोदाचे कार्यकारी संचालक एस.एल. जैन, मुनिश्री प्रमुख सागरजी, महासती कंचनकंवरजी, साध्वी कैलाशवतीजी आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म, जाती, पंथ आहेत. पण भारतीय म्हणून विचार केल्यास सर्व भेद विसरून हा सारा समाज भारतीय होऊन जातो. अनेक ऋषी, मुनी, महात्मे यांच्या कठोर तपस्येमुळे देशाची निरंतरपणे प्रगती होत आहे. देशात आर्यकाळापासून ज्ञानाची प्रथा चालत आलेली आहे. समाजातील अनेक धर्मांचे लोक विविध देशांतून शिक्षण घेत असून या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. हे ज्ञान आता पूर्ण विश्वात पसरत आहे. सूर्य जसा जाती-पाती, धर्म, वंश न मानता सर्वांना समान प्रकाश देतो त्याचप्रकारे देशात जाती-पाती उच्च-नीच न मानता सर्व समान आहेत. क्षमा हे वीर माणसाचे भूषण असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने वीर बना, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ऋषी, मुनींचा आशीर्वाद आणि उच्च आदर्शामुळे देश सशक्त व समर्थ बनेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.या वेळी मोतीलाल ओसवाल व देवेंद्र भाई यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जैन संघ रथयात्रेला सुरुवातपर्युषण पर्वानिमित्त दक्षिण मुंबई येथे आयोजित जैन संघ रथयात्रेस आज राज्यपालांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुंबई जैन संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जैन संघांचे साधू-साध्वी, नागरिक या वेळी उपस्थित होते. मुंबईत पहिल्यांदाच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जैन समाजातील सर्व समूहांच्या गुरूंनी एकत्र येऊन समाजाला एकतेचा संदेश दिला. पर्युषणपर्वानिमित्त शुभेच्छा देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, केवळ रूपवान, धनवान, बलवान असणे पुरेसे नाही, तर मनुष्याने क्षमावान असणे महत्त्वाचे आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जैन बांधवांचा मोठा महासागर पाहावयास मिळाल्याचेही राज्यपाल म्हणाले.