शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:33 IST

महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार?

आपल्या देशात निरक्षरता हा प्रश्न आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्यापर्यंत आजही आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आरोग्य माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक असल्याने त्याकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध पाणी हीसुद्धा मुलभूत गरज आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांमध्ये शासनाप्रमाणेच लोकसहभागही असायला हवा. शासनाची धोरणे स्पष्ट आणि सुलभ असतील तर नागरिकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. समाजातील श्रीमंत-गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती वर्षाला ५-१० लाख रुपये कमावते, तर दुसरीकडे मजुराला रोजचा उदरनिर्वाह होईल एवढाही रोजगार मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या देश आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा समस्यांचाही सामना करतो आहे. महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार? अधोगती झाल्यास पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एकवटले पाहिजे.धार्मिक सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये सहिष्णुतेवर हल्ला करणाऱ्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. घटनेने आपल्यासमोर मोठे आणि उदात्त स्वप्न ठेवले आहे आणि सर्व भारतीयांना मिळून ते पूर्ण करायचे आहे. त्यामुळे देशात, राज्यात घडणारी प्रत्येक कृती ही संविधानातील मुल्यांना अनुसरुनच असली पाहिजे. धर्म हा वैयक्तिक साधनेचा मार्ग असतो. मात्र, सार्वजनिक जीवनात भारतीय हा एकच धर्म आहे. माणुसकी हे समाजाच्या जीवनाचे मूल्य असले पाहिजे. ख्रिश्चन हा माझा साधनेचा धर्म असला तरी भारतीय हा माझा समाजधर्म आहे. प्रत्येकाने त्यादृष्टीने विचार करायला हवा.सध्या सभोवतालचे वातावरण संशय आणि भयग्रस्त बनले आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, प्रतिष्ठेवर होणारे हल्ले चिंतनीय आहेत. भारतीय संस्कृतीने स्त्रीला देवता मानले. समाज मात्र तिचे माणूसपणही नाकारतो आहे. स्त्रीला समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. आदिवासी हेही समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची धोरणे आखली गेली पाहिजेत.महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. संतपंरपरेने आपली संस्कृती समृद्ध केली. तुकोबांनी ‘जे का रंजले गांजले’ हा संदेश आपल्याला दिला. तुकोबांचे वचन हे देशाचे मुख्य धोरण झाले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु, ७० वर्षानंतरही स्वातंत्र्याची किरणे गरिबांच्या झोपडीपर्यंत पोचली की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. गरिबांना हा देश आपला वाटला पाहिजे. स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी असून, ती प्रत्येकाने जबाबदारीनेच जपली पाहिजे.