शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भारतीय हाच प्रत्येकाचा समाजधर्म असावा- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:33 IST

महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार?

आपल्या देशात निरक्षरता हा प्रश्न आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्यापर्यंत आजही आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आरोग्य माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक असल्याने त्याकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध पाणी हीसुद्धा मुलभूत गरज आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारख्या योजनांमध्ये शासनाप्रमाणेच लोकसहभागही असायला हवा. शासनाची धोरणे स्पष्ट आणि सुलभ असतील तर नागरिकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. समाजातील श्रीमंत-गरीब ही दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती वर्षाला ५-१० लाख रुपये कमावते, तर दुसरीकडे मजुराला रोजचा उदरनिर्वाह होईल एवढाही रोजगार मिळत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या देश आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा समस्यांचाही सामना करतो आहे. महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे प्रतिगामी शक्तींमुळे आपली वाटचाल मागच्या दिशेने होणार असेल, तर प्रगती कशी साधली जाणार? अधोगती झाल्यास पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एकवटले पाहिजे.धार्मिक सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे गेल्या काही काळामध्ये सहिष्णुतेवर हल्ला करणाऱ्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बाधा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. घटनेने आपल्यासमोर मोठे आणि उदात्त स्वप्न ठेवले आहे आणि सर्व भारतीयांना मिळून ते पूर्ण करायचे आहे. त्यामुळे देशात, राज्यात घडणारी प्रत्येक कृती ही संविधानातील मुल्यांना अनुसरुनच असली पाहिजे. धर्म हा वैयक्तिक साधनेचा मार्ग असतो. मात्र, सार्वजनिक जीवनात भारतीय हा एकच धर्म आहे. माणुसकी हे समाजाच्या जीवनाचे मूल्य असले पाहिजे. ख्रिश्चन हा माझा साधनेचा धर्म असला तरी भारतीय हा माझा समाजधर्म आहे. प्रत्येकाने त्यादृष्टीने विचार करायला हवा.सध्या सभोवतालचे वातावरण संशय आणि भयग्रस्त बनले आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. स्त्रियांच्या हक्कांवर, प्रतिष्ठेवर होणारे हल्ले चिंतनीय आहेत. भारतीय संस्कृतीने स्त्रीला देवता मानले. समाज मात्र तिचे माणूसपणही नाकारतो आहे. स्त्रीला समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. आदिवासी हेही समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची धोरणे आखली गेली पाहिजेत.महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे. संतपंरपरेने आपली संस्कृती समृद्ध केली. तुकोबांनी ‘जे का रंजले गांजले’ हा संदेश आपल्याला दिला. तुकोबांचे वचन हे देशाचे मुख्य धोरण झाले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु, ७० वर्षानंतरही स्वातंत्र्याची किरणे गरिबांच्या झोपडीपर्यंत पोचली की नाहीत, हा खरा प्रश्न आहे. गरिबांना हा देश आपला वाटला पाहिजे. स्वातंत्र्य ही आपली जबाबदारी असून, ती प्रत्येकाने जबाबदारीनेच जपली पाहिजे.