शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

भारतीय रिअल्टी, सोन्याची चमक कायम

By admin | Updated: June 5, 2014 00:35 IST

जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.

नवी दिल्ली : जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे या दोन क्षेत्रंमध्ये चमक दिसत असली तरी कंपन्यांमधील गुंतवणूक घटत असल्यामुळे त्यांच्या भागभांडवलामध्ये घट झालेली दिसून येत आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटन (सीएसओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2क्क्8 पासून जगभरातील अनेक अर्थव्यवस्था या मंदीचा सामना करीत असताना याच काळात भारतामध्ये मात्र सोने आणि स्थावर मालमत्तेची खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे. मात्र याच कालावधीत कंपन्यांमधील गुंतवणूक कमी झाल्यामुळे कंपन्यांचे भागभांडवल कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.
 भारतीय नागरिकांचे सोन्याबाबतचे प्रेम हे सर्वज्ञात आहे. लगAसमारंभ, विविध सण आणि समारंभासाठी तसेच गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणो स्थावर मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक ही कायमस्वरूपी वाढीव लाभ देणारी असते, असाही एक मतप्रवाह असून त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
15 सप्टेंबर, 2क्क्8 रोजी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची बॅँक असलेल्या लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी जाहीर झाली आणि त्यानंतर जगावर आर्थिक मंदीचे सावट आले. सन 2क्क्8 मध्ये भारतातील खासगी कंपन्यांमधील भांडवल हे देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 18.8 टक्के असे सर्वाधिक होते. सन 2क्13 मध्ये ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 9.9 टक्क्यांर्पयत खाली आले आहे. यामुळे देशातील कंपन्यांना खेळत्या भांडवलाची कमतरता जाणवत असून त्यांची उत्पादनक्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे.
लेहमन संकट आले तेव्हा भारताची सोने आणि स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक 48 टक्के होती. त्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. यावेळी भारतीयांची बचत, म्युच्युअल फंडस्, शेअर बाजार अशा सर्व प्रकारांतील गुंतवणूक 52 टक्के होती ती आता 32.4 टक्क्यांर्पयत घसरली आहे.
सन 2क्क्8 ते 2क्13 या काळात कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली तसेच मागणी घटल्याने मालाला फारसा उठाव राहिलेला नसल्याने कंपन्यांच्या नफ्यात घट होताना दिसत आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या बॅँक आणि वित्तीय कंपन्या वगळता 2क्क् कंपन्यांच्या सरासरी नफ्यात घट होत आहे. 2क्क्8 मध्ये सरासरी नफा 19.8 टक्क्यांवरून आता 15.6 टक्क्यांर्पयत खाली आला आहे. त्याचा फटका कंपन्यांमधील गुंतवणूक कमी होण्यात झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
गेल्या पाच वर्षामध्ये शहरी भागातील नागरिकांपेक्षा ग्रामीण नागरिकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीचा दर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.
खाद्यपदार्थाच्या वाढीव किमती, शेतजमिनीला मिळत असलेला अधिक दर, शेतमालाच्या घाऊक मूल्यात झालेली वाढ, ग्रामीण भागात सुरू असलेले रोजगार हमी कार्यक्रम, तसेच रस्ता निर्मिती यामुळे या भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढताना दिसत आहे.
 
आकाशाला भिडणारी महागाई आणि आर्थिक मंदी यामुळे पगारदार शहरी नागरिकांच्या उत्पन्नामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये फारशी वाढ झालेली दिसत नाही.
4यामुळे शहरी पगारदारांना या काळात गुंतवणुकीला फारसा वाव मिळालेला नाही. या व्यक्ती आपले उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते विविध मार्ग अवलंबता येतील याचाच शोध घेताना दिसून येत आहेत.