शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

इंडियन डेंटल असोसिएशनने मदरशातील विद्यार्थ्यांना दिले तंबाखूमुक्तीचे धडे

By admin | Updated: May 23, 2017 14:14 IST

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने तंबाखुसेवनाचे दुष्परिणाम नमूद करणारी आणि युवकांवर लक्ष केंद्रित करणारी एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे

स्नेहा मोरे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने तंबाखुसेवनाचे दुष्परिणाम नमूद करणारी आणि युवकांवर लक्ष केंद्रित करणारी एक महत्वाची मोहीम हाती घेतली आहे. एक पाऊल पुढे जात आयडीएतर्फे इतरही मदरशांच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आयडीए ही दंतचिकित्सा क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना असून २९ राज्ये आणि सात केंद्राशासीत प्रदेशांसह तिचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव आहे. तिच्या देशभरात ४५० स्थानिक शाखा आहेत. आयडीएने मालाड येथील मालवणीमधील मदरसा जामिया अर्बिया मिन्हाजुल सुन्नाह येथे नुकतेच पहिले प्रात्यक्षिक दाखविले आणि बैठक घेतली.
 
या बैठकीमध्ये आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ अशोक ढोबळे आणि त्यांच्या चमूने मदरशातील शिक्षकांबरोबरच युवा विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडातील दुर्गंधी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाय उदधृत केले.
 
“आरोग्यपूर्ण दात तोंडात असतील तर तुम्हाला अन्न उत्तमपणे चावणे शक्य होते आणि तसे झाल्यास शरीरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहता येते. या गोष्टींकडे कानाडोळा करणे चुकीचे आहे. सकाळी एकदा आणि रात्री झोपण्याआधी एकदा असे दिवसातून दोनदा दात घासा. तसे केल्यास तुम्हाला कित्येक रोग टाळता येवू शकतात,” असेही ते पुढे म्हणाले. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ब्रश आणि जबड्याच्या मॉडेलचा वापर केला गेला.
 
इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)चे मानद सरचिटणीस श्री ढोबळे यांनी याधीही अनेक अशाप्रकारचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यावेळी केवळ स्थळ आणि त्यांच्यासमोरील प्रेक्षक बदलले होते. इमाम, धर्मगुरू आणि शिक्षक बनण्यासाठी आलेल्या मुलांसमोर यावेळी त्यांनी प्रात्यक्षिके हाती घेतली होती. “मी पहिल्यांदाच मदरशाला भेट दिली आणि येथील मुलांना संबोधित केले. शहरात आणखी असे बरेच कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत,” असेही ढोबळे म्हणाले. आयडीएच्या काही महिला दंतचिकित्सक इतर मदरसांमध्ये काम करण्यास सज्ज आहेत. त्यासाठी मालाड येथील शाळेचे प्राध्यापक मौलाना नौशाद आलम यांच्या संपर्काचा वापर करून इतर मदरसांमध्ये अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.   
 
मदरसांमध्ये अशा प्रकारची मौखिक जागरुकता शिबिरे घेणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजाच्या योगदानावर चालविली जाणारी आणि पायाभूत सुविधांची वानवा असलेली ही विद्यालये आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चमू आणि व्यक्तींच्या समाजोपयोगी कामांपासून वंचित आहेत. अशाप्रकारचे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यातील बरचसे मदरसे हे दाट वस्त्यांमध्ये वसले असून ते अमली पदार्थविक्री करणाऱ्याचे आणि गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत. आरोग्य निगेसाठी जागृती शिबिरे घेणे अत्यंत महत्वाचे ठरले आहे. म्हणूनच तंबाखूरहित आरोग्याचा मंत्र देत असताना ढोबळे यांनी मुलांना अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणामही नमूद केले. “अमली पदार्थ तुम्हाला हळू हळू मारतात. ते आधी तुमच्या संवेदना मारतात आणि मग तुमच्यातील काहीही करण्याची शक्तीच काढून घेतात. तुम्ही तुमचे कुटुंब आणि समाजासाठी एक बोजा बनून राहता. जर तुम्ही या विळख्यात अडकला असाल तर ही सवय सोडून द्या,” ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक या दोघानांही पान आणि गुटख्यापासून दूर राहण्याचे आणि अशा सवयी सोडून देण्याचे आवाहन केले.
 
अरेबिक शिक्षक मौलाना अब्दुल कादिर यांना हा सल्ला मनोमन पटला. “मी आता पानही सोडण्याचा विचार करत आहे,” ते हसत हसत म्हणाले. त्यांच्या दातांवर त्यांच्या अनारोग्यापूर्ण सवयीच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या.
 
एजाज अली (१४), हिफ्झ (कुराणचे पाठांतर) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. त्याने मदरशामधील अभ्यासक्रमामध्ये मौखिक आरोग्य शिकविले जात नाही, असे जेव्हा मान्य केले तेव्हा त्याला त्याच्या कित्येक सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारच्या माहितीपूर्ण सत्रांचे आयोजन केले गेले पाहिजे, असेही तो म्हणाला. आम्ही सकाळपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत अभ्यासात गढून जातो. जेव्हा आम्हाला कोणी सांगतो की आपले कपडे स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपले दात चकचकीत ठेवणेही गरजेचे आहे, तेव्हा ते आमच्या सोयीचे ठरते,” असेही अली यांनी पुढे म्हटले.
 
“इतर वाईट सवई आणि घटकांपासून स्वतःला कसे वाचवावे याचे धडे विद्यार्थ्यांना मिळालेच, पण त्याचबरोबर मदरशांनाही त्यांनी रोग आणि वाईट गोष्टी कशा बाजूला ठेवाव्यात याचे धडे देणे गरजेचे होते. वाईट मौखिक निगेमुळये उद्भवणारे रोग हा याच रोगांचा एक भाग आहे,” असे एका शिक्षकाने यावेळी म्हटले.
 
“आपल्या स्वतःच्या सदस्यांमध्ये व्यावसायिक सुधारणा घडवून आणताना देशातही कमाल मौखिक आरोग्य कसे सध्या होईल, यावर आमचा पूर्ण भर असतो आणि तेच आमचे मिशन आहे. मौखिक आरोग्यावर आयडीएचा पूर्ण विश्वास आहे आणि २०२० पर्यंत प्रत्येक भारतीयाला किमान मौखिक आरोग्य प्राप्त करून देणे या आपली ध्येयाप्रती ती सातत्यपूर्णपणे काम करत असते,” असेही डॉ अशोक ढोबळे यांनी स्पष्ट केले.