शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

भारत जगातील उत्पादनाची फॅक्टरी बनेल- मुख्यमंत्री

By admin | Updated: June 26, 2016 14:37 IST

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले गेल्या तीस वर्षांत शेजारच्या चिन देश जगातील उत्पादनाची फॅक्टरी म्हणून ओळखले जात होते, पण येत्या काही वर्षांतच भारत चिनला मागे टाकून

ऑनलाइन लोकमत

कोल्हापुर, दि. २६ : विदेशातील मोठे उद्योग भारतात येत असून,  येत्या  कांही वर्षातच भारत जागातील उत्पादनाची फॅक्टरी बनेल , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅक भवन उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले गेल्या तीस वर्षांत शेजारच्या चिन देश जगातील उत्पादनाची फॅक्टरी म्हणून ओळखले जात होते, पण येत्या काही वर्षांतच भारत चिनला मागे टाकून निश्चितच जागतीक उत्पादनाची फॅक्टरी बनेल, जगभरात मोठ्या प्रमाणावर मंदी आहे, आणि भारताचा आर्थिक विकास दर  7.6 % इतका आहे, आणखी तो वाढणार आहे, त्यामुळे संपूर्ण जगभरातील मोठ्या उद्योगांचे लक्ष आता भारताकडे आहे, अनेक मोठे उद्योग भारतात आले आहेत, तर बरेच येण्याच्या तयारीतआहेत, भारताची 65% लोकसंख्या 35% च्या आतील आहे, त्यामुळे भारताकडे ग्लोबलायजेशन करण्यासाठी युवा पिढी आहे, .

कोल्हापूरच्या उद्योगां बाबत बोलताना म्हणाले येथील उद्योगाची मुहूर्त मेढ छत्रपती शाहू महाराजांनी रोवली आहे, शेती, उद्योग, व्यापारामुळे कोल्हापूर जिल्हा राज्यात आग्रगण्य म्हणून ओळखला जातो, उद्योग वाढायचा असेल तर त्याठिकाणी विमान सेवा उपलब्ध असली पाहिजे, केंद्र सरकारच्या  नव्या योजनेतून  कोल्हापूरची विमान सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे,  लवकर विमान सेवा  सुरू होईल ,  तर कोल्हापूर हे फौंड्री हब म्हणून ओळखले जाते, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर फौंड्री उद्योग आहे, आधुनिक फौंड्री हबसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवा राज्य शासन तो मंजूर करेल . वीज दरवाढीबाबत बोलताना त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांना  विजेच्या दरात सुट दिली जाणार आहे, तर एक लाख सत्तर हजार शेतकर्‍यांना नवीन कनेक्शन दिली आहेत, त्यामुळे हा बोजा उद्योजकांवर पडला आहे, पण लवकरच उद्योगांचा विज दर ही काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, डी झोन मधील उद्योगांचा वीज दर कमी होणारच आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना आश्वासन दिले. 

यावेळी स्मॅक भवनसाठी 41 लाख रुपयांची देणगी दिल्या बद्दल जेष्ठ उद्योजक श्री रामप्रताप झंवर , तसेच 25 लाख रुपयांची देणगी दिल्या बद्दल उद्योजक  सचिन शिरगांवकर , यांच्यासह जेष्ठ उद्योजक तुकाराम पाटील, के. रवीकुमार , आशा जैन, आनंदराव पाटील, सचिन पाटील,शिरीष सप्रे, सुनिल जानवाडकर ,  नेमचंद  संघवी, पांडुरंग बुधले , प्रकाश राठोड, महेंद्र राठोड, दीपक परांडेकर यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

1)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मॅक भवनचे उद्घाटन केल्यानंतर संपूर्ण वस्तूची पहाणी केली  ,ही वास्तू पंचगंगा नदी किनारी बांधल्याने नदी आणि संपूर्ण परिसर हिरवागार, निसर्गाने नटलेला नयनरम्य दिसतो, हे पाहून मुख्यमंत्र्यानी ही वास्तू पाहून मंत्रालया ऐवजी एक दिवस इथूनच राज्याचा कारभार चालवावा इतकी सुंदर वास्तू आणि परिसर आहे असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

2) राजकीय आखाडा रंगला -स्मॅक भवनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्याच्या ओगोदर शेतकरी संघटनेचे  खासदार राजू शेट्टी ,आमदार सदाभाऊ खोत , आमदार सतेज पाटील, चंद्रदिप नरके, सुजित मिणचेकर , आले होते, मुख्यमंत्री येईपर्यंत यांच्या गप्पा रंगल्या होत्या, यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख भगवानराव काटे यांनी सतेज पाटील यांना आपण दाढी वाढवायला आपण काहीतरी "पण" केला आहे , यावर सदाभाऊ खोत यांनी बळीच राज्य येऊदे म्हणून दाढी वाढवली आहे, असे म्हणताच हस्याचे फवारे उडाले ,तर सतेज पाटील यांनी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांना संबोधून जैन साहेब आमच्या आघाडीच्या काळात उद्योजक बरेच प्रश्न घेऊन भांडत होते, आत्ता सुद्धा मुख्यमंत्र्याना कोल्हापूरचे विमानतळ , मुंबई बंगळूर कॉरीडोर , विज दरवाढ या बाबत सांगा असे म्हणताच पुन्हा हस्याचे फवारे उडाले  सर्व पक्षाचे लोकप्रतिनीधी एकत्र आल्याने जोरदार राजकीय आखाडा रंगला होता