शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 11:37 IST

नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले

ठळक मुद्देकिसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.

नाशिक : ‘मैं भारत को सुरक्षित बनाने के लिये, प्रयास करुंगा, किसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ घेत शेकडो बालक व विद्यार्थी एकत्र आले. बाल अत्याचाराविरुध्द जनजागृतीच्या उद्देशाने ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भारत यात्रेचे सहा गट देशभर प्रवास करत असून सत्यार्थी यांचे पुत्र भुवन रिभू हे स्वत: शहरात रविवारी (दि.१) भारत यात्रेच्या जथ्थ्यासह दाखल झाले.

शहरातील एन.जी.ओ. फोरमच्या विविध स्वयंसेवी संस्थांसह परिचारिका महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, महापालिका व खासगी शाळांचे विद्यार्थी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, रिभू यांनी उपस्थितांना बाल शोषणाविरुध्द आवाज उठविण्याची शपथ दिली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे आदि उपस्थित होते.रिभू यांनी यावेळी प्रास्ताविकातून भारत यात्रा व त्यामागील उद्देश समजावून सांगितला. यानंतर मैदानावरून भारत यात्रा फेरीला प्रारंभ करण्यात आला. यात्रा ईदगाह मैदान, त्र्यंबकरोडने, अण्णा भाऊ साठे चौकातून मार्गस्थ होत शालीमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी.रोडवरून सीबीएसमार्गे ईदगाह मैदानावर सकाळी अकरा वाजता यात्रेचा समारोप करण्यात आला.