शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“२०३० पर्यंत PM मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 23:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात असून, राज्यासह देशातील नेते दौरे, सभा, रॅली यातून जनसंवाद वाढवताना दिसत आहेत. भारत ही जगातील गतिमानतेने वाढणारी अर्थव्यवस्था असून, लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते, असे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत देशवासीयांना आश्वस्त केले आहे. यातच सन २०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे. सामान्य माणसाचा तसेच गरीब माणसाच्या कल्याणाचा अजेंडा आखला जात आहे. सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना तयार होत आहे. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. २०३० पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

मागेल त्याला शेततळे राज्य सरकारकडून दिले जात आहे

मागेल त्याला शेततळे राज्य सरकारकडून दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी कुठलीही अट न घालता अनेक योजनांचा लाभ दिला जात आहे. केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्रच्या राज्य सरकारने ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारसोबतच आणखी सहा हजाराची भर घालून शेतकऱ्यांना आता सन्मान निधी १२ हजार रूपये दिले जात आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या धानाला पाचशे रुपयाचा बोनसही राज्य सरकारने दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना कुठलीही अट न ठेवता पाच लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार मिळणार आहे. पुढल्या वर्षी पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे सिंचनाचे काम पूर्ण करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेतीला पाणी उपलब्ध उपलब्ध होऊ शकणार आहेत. आपलं राज्य सरकार हे सामान्य लोकांच्या गरिबांच्या तसेच शेतकऱ्यांच्या नेहमी सोबत आहे. गोसेखुर्दमध्ये जलसिंचनासोबतच साडेचारशे कोटींचा पर्यटन जलपर्यटनाचे काम सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस