शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांच्या संरक्षणासाठी स्थापणार स्वतंत्र पोलीस दल

By admin | Updated: September 7, 2016 15:14 IST

एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते.

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
पोलीसांची कुणालाच... विशेषत: समाजकंटकांना भीतीच वाटत नसल्यामुळे पोलीसांवर  हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
रझा अकादमीच्या आंदोलनाच्या वेळी आझाद मैदान परीसरात आंदोलकांनी पोलीसांना मोठ्या प्रमाणावर मारहाण केली होती, ज्याच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी आझाद मैदानातच बंदी असूनही प्रचंड मोठी सभा घेत या हल्ल्यांचा निषेध केला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेकवेळा पोलीसांवर हल्ले झाले आहेत. काल तर कल्याण येथील गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीसाला गणेश विसर्जन तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडल्याचे समजते. पोलीस महासंचालकांसह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत पोलीसांच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारेपर्यंत पोलीसांनी काय काळजी घ्यावी यावरही चर्चा झाली असून महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे...
- पोलीसांनी नेहमी स्वत:जवळ मिरचीची पूड बाळगावी.
- दिवस वाईट असल्याने शक्यतो संध्याकाळी सातच्या आत पोलीस ठाण्यात परतावे. विशेषत:  रात्री दहा नंतर कुठेही एकटं जाऊ नये, बरोबर किमान दोन पोलीस असतील याची दक्षता घ्यावी.
- कुठल्याही कारणासाठी जमाव जमला असेल, तर जमावामध्ये आणि स्वत:मध्ये किमान 20 फूटांचे अंतर ठेवावे.
- व्हीआयपी प्रोटेक्शन, म्हणजे राजकारण्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर असलेल्या पोलीसांनी शस्त्र बाळगू नये, ते अन्य पोलीसांना द्यावे कारण राजकारण्यांकडे व त्यांच्या खासगी अंगरक्षकांकडे जास्त चांगली शस्रे असतात.
- प्रत्येक पोलीसाने मोबाईलमध्ये खासगी सुरक्षा संस्थांचे फोन नंबर सेव्ह करून ठेवावे, आणि तसाच प्रसंग ओढवला तर त्यांना लागलीच बोलावून घ्यावे.
- बेकायदेशीर कृत्यांसाठी कुणाचीही गाडी अडवल्यानंतर, आधी ओळख विचारावी, जर आपल्या कुवतीपेक्षा वरची ओळख निघाली तर उगाच रिस्क न घेता सोडून द्यावे. परंतु, जर ती व्यक्ती आम आदमी असेल, तर त्याला लागलीच कायद्याचा बडगा दाखवावा.
- ड्युटीवर असताना शक्यतो झोपू नये. परंतु, 24 - 24 तास ड्युटी लावली असेल तर झोपताना, बंदुकीची नळी जमिनीवर, व दांडा हनुवटीखाली ठेवून झोपावे. उलट पद्धत अवलंबल्यामुळे काही जणांनी प्राण गमावले आहेत.
- भेंडी बाजारात गस्तीसाठी वा कारवाईसाठी जायचे असल्यास आमदार राज पुरोहीतांशी सल्लामसलत करून, त्यांनी गो अहेड म्हटल्यावरच जावे.
- पोलीसांनी रोज सकाळी धावण्याचा व्यायाम करावा, अडीअडचणीला पळून जायला केवळ याचाच फायदा होईल.
- अत्यंत कमी संख्येमुळे पोलीसांवर प्रचंड ताण आहे, आणि त्याचा राग कुठे ना कुठे बाहेर येतो. परंतु, स्वसुरक्षेच्या दृष्टीकोनातून, आत्ता जी प्रथा आहे ती, म्हणजे, साधे, गरीब, पापभिरू, पोलीसांना घाबरणाऱ्या नागरिकांवरच सगळा राग बाहेर काढावा, त्यांना वेठीस धरावं. उगाच, दांडग्यांपुढे नी राजकीय किंवा गुंडांचं पाठबळ असलेल्या उडाणटप्पूंना वर्दीची हैसियत दाखवायला जावू नये.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घरातून निघताना साध्या कपड्यात यावं, ठाण्यात आल्यावर गणवेश चढवावा. घर ते पोलीस ठाणे या प्रवासात कुठलाही अतिप्रसंग ओढवला तर सरकार जबाबदार नसेल.
(ही वात्रटिका आहे. कृपया खरी बातमी समजू नये.)