शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीसांच्या संरक्षणासाठी स्थापणार स्वतंत्र पोलीस दल

By admin | Updated: September 7, 2016 15:14 IST

एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते.

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
पोलीसांची कुणालाच... विशेषत: समाजकंटकांना भीतीच वाटत नसल्यामुळे पोलीसांवर  हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या आपल्या पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्यात येणार असल्याचे समजते. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
रझा अकादमीच्या आंदोलनाच्या वेळी आझाद मैदान परीसरात आंदोलकांनी पोलीसांना मोठ्या प्रमाणावर मारहाण केली होती, ज्याच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी आझाद मैदानातच बंदी असूनही प्रचंड मोठी सभा घेत या हल्ल्यांचा निषेध केला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेकवेळा पोलीसांवर हल्ले झाले आहेत. काल तर कल्याण येथील गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीसाला गणेश विसर्जन तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडल्याचे समजते. पोलीस महासंचालकांसह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत पोलीसांच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पोलीसांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल उभारेपर्यंत पोलीसांनी काय काळजी घ्यावी यावरही चर्चा झाली असून महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे...
- पोलीसांनी नेहमी स्वत:जवळ मिरचीची पूड बाळगावी.
- दिवस वाईट असल्याने शक्यतो संध्याकाळी सातच्या आत पोलीस ठाण्यात परतावे. विशेषत:  रात्री दहा नंतर कुठेही एकटं जाऊ नये, बरोबर किमान दोन पोलीस असतील याची दक्षता घ्यावी.
- कुठल्याही कारणासाठी जमाव जमला असेल, तर जमावामध्ये आणि स्वत:मध्ये किमान 20 फूटांचे अंतर ठेवावे.
- व्हीआयपी प्रोटेक्शन, म्हणजे राजकारण्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर असलेल्या पोलीसांनी शस्त्र बाळगू नये, ते अन्य पोलीसांना द्यावे कारण राजकारण्यांकडे व त्यांच्या खासगी अंगरक्षकांकडे जास्त चांगली शस्रे असतात.
- प्रत्येक पोलीसाने मोबाईलमध्ये खासगी सुरक्षा संस्थांचे फोन नंबर सेव्ह करून ठेवावे, आणि तसाच प्रसंग ओढवला तर त्यांना लागलीच बोलावून घ्यावे.
- बेकायदेशीर कृत्यांसाठी कुणाचीही गाडी अडवल्यानंतर, आधी ओळख विचारावी, जर आपल्या कुवतीपेक्षा वरची ओळख निघाली तर उगाच रिस्क न घेता सोडून द्यावे. परंतु, जर ती व्यक्ती आम आदमी असेल, तर त्याला लागलीच कायद्याचा बडगा दाखवावा.
- ड्युटीवर असताना शक्यतो झोपू नये. परंतु, 24 - 24 तास ड्युटी लावली असेल तर झोपताना, बंदुकीची नळी जमिनीवर, व दांडा हनुवटीखाली ठेवून झोपावे. उलट पद्धत अवलंबल्यामुळे काही जणांनी प्राण गमावले आहेत.
- भेंडी बाजारात गस्तीसाठी वा कारवाईसाठी जायचे असल्यास आमदार राज पुरोहीतांशी सल्लामसलत करून, त्यांनी गो अहेड म्हटल्यावरच जावे.
- पोलीसांनी रोज सकाळी धावण्याचा व्यायाम करावा, अडीअडचणीला पळून जायला केवळ याचाच फायदा होईल.
- अत्यंत कमी संख्येमुळे पोलीसांवर प्रचंड ताण आहे, आणि त्याचा राग कुठे ना कुठे बाहेर येतो. परंतु, स्वसुरक्षेच्या दृष्टीकोनातून, आत्ता जी प्रथा आहे ती, म्हणजे, साधे, गरीब, पापभिरू, पोलीसांना घाबरणाऱ्या नागरिकांवरच सगळा राग बाहेर काढावा, त्यांना वेठीस धरावं. उगाच, दांडग्यांपुढे नी राजकीय किंवा गुंडांचं पाठबळ असलेल्या उडाणटप्पूंना वर्दीची हैसियत दाखवायला जावू नये.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, घरातून निघताना साध्या कपड्यात यावं, ठाण्यात आल्यावर गणवेश चढवावा. घर ते पोलीस ठाणे या प्रवासात कुठलाही अतिप्रसंग ओढवला तर सरकार जबाबदार नसेल.
(ही वात्रटिका आहे. कृपया खरी बातमी समजू नये.)